आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • The Blast Of Chief Minister's Day And Night Programs Across The State Has Completely Cooled Down, The Result Of The Nearing Of The Result Date.

धाकधूक:मुख्यमंत्र्यांचा दिवसरात्र कार्यक्रमांचा‎ राज्यभरातील धडाका पूर्ण थंडावला‎, निकालाची तारीख जवळ आल्याचा परिणाम‎

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणजे रात्री दोन ‎ ‎ वाजेपर्यंत लोकांना भेटणारा, कायम‎ जाहीर कार्यक्रमात रमणारा नेता, परंतु ‎ ‎ राज्यातील सत्तासंघर्षाची सुनावणीची‎ तारीख जवळ आल्याने मुख्यमंत्री शिंदे‎ यांच्या कार्यक्रमाचा राबता कमी झाला‎ आहे. मुख्यमंत्र्यांबरोबरच शिवसेनेचे ९‎ मंत्री आता मंत्रालयात दिसत नसून‎ शिवसेनेचे आक्रमक प्रवक्ते आता थंड‎ झाले आहेत. विशेष म्हणजे बहुतांश ‎ ‎ कार्यक्रमात शिंदेंसोबत असलेले‎ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस क्वचितच ‎ ‎ एखाद्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांसोबत ‎ ‎ दिसतात. त्याविषयी उलटसुलट चर्चा होत ‎ आहे.‎

मुख्यमंत्र्यांचा कारभार मुंबईतील वर्षा,‎ नंदनवन तसेच ठाण्यातील शुभदीप या‎ निवासस्थानातून चालतो. बैठका मलबार‎ हिलच्या सह्याद्री अतिथीगृहात आणि‎ मंत्रिमंडळ बैठकीवेळी मंत्रालयाच्या‎ सहाव्या मजल्यावरील सीएमओमध्ये‎ मुख्यमंत्री काम करायचे. दिवसभराच्या‎ सरकारी बैठका, सायंकाळचे जाहीर‎ कार्यक्रम आणि रात्री पक्षप्रवेशाचे सोहळे‎ असा पहाटे दोन वाजेपर्यंत त्यांचा व्यस्त‎ दिनक्रम होता. गेले ९ महिने असाच‎ दिनक्रम आहे. गणेशोत्सवात तर त्यांनी २४‎ तासांत ५०० पेक्षा अधिक गणेश मूर्तींचे‎ दर्शन घेतल्याचे मुख्यमंत्री कार्यालयातून‎ आवर्जून कळवण्यात आले होते.‎ मुख्यमंत्र्यांच्या कामकाज पत्रिकेतील‎ कार्यक्रम आता कमी दिसतात. त्यातही‎ आमदारांच्या मतदारासंघातील‎ बैठकासारखे अगदी क्षुल्लक असतात.‎ मंत्रिमंडळ बैठकीतील प्रस्ताव गौण‎ असतात. दर आठवड्याला मंत्रिमंडळ‎ बैठक होत नाही. यासंदर्भात‎ मुख्यमंत्र्यांच्या सहकाऱ्यांकडे विचारणा‎ केली असता, खारघर उष्माघात‎ दुर्घटनेनंतर साहेबांनी जाहीर कार्यक्रम‎ कमी केले असल्याचे सांगण्यात आले.‎ शिवसेनेचे ९ कॅबिनेट मंत्री आहेत. सर्व‎ ‎आघाड्यांवर प्रवक्ते नेमलेले होते. उद्धव‎ गटाकडून नुसते चू झाले की शिंदे गटाची‎ फौज लागलीच तुटून पडत असे.

गेल्या‎ दहा दिवसांत शिंदे गटात कमालीची‎ शांतता आहे. मुख्यमंत्री बॅकफूटवर आले‎ आहेत. मंत्री दिसेनासे झाले आहेत आणि‎ प्रवक्ते माध्यमांच्या संपर्कात नाहीत.‎ शिवसेनेचा आक्रमक गट एकदम कोशात‎ गेल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.‎

सातारा गावातील दौऱ्यानंतर सारे बंद‎
१.
मंत्रालयासमोर शिवसेनेचे म्हणजे‎ शिंदे गटाचे बाळासाहेब भवन आहे, तेथे‎ आता पूर्ण शुकशुकाट असतो. प्रवक्ते‎ आता ठाकरे गटाच्या दाव्यांना प्रत्युत्तरे‎ देताना दिसत नाहीत.

२. शिवसेनेच्या‎ मंत्र्यांनी पत्रकार परिषदा घेणे आता‎ थांबवले आहे.

३. खारघर उष्माघात‎ प्रकरण १८ एप्रिल रोजी घडले, त्यानंतर‎ मुख्यमंत्री ३ दिवस सातारा जिल्ह्यातील‎ मूळ गावी गेले. तेव्हापासून त्यांचा‎ एकही जाहीर कार्यक्रम झाला नाही,‎ असे स्पष्ट दिसते.‎

‎मंत्र्यासोबतच्या‎ अधिकाऱ्यांची मूळ‎ अास्थापनेत‎ जाण्याची तयारी‎
सर्वोच्च न्यायालयातील सत्तासंर्षाच्या निकालाचा शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदावर काहीएक परिणाम‎ होणार नाही, असा शिंदे गटाच्या मंत्र्यांचा दावा आहे. मात्र बदल्यांचे कामे उरकुन घेण्याकडे त्यांचा‎ कल वाढला आहे. ८ मे रोजी सत्तासंघर्षाचा निकाल येणे अपेक्षीत आहे. त्यानंतर राज्यात राजकीय‎ उलथापालथी घडू शकतात. सरकार गडगडले तर मंत्र्यांच्या कार्यालयातील अनेक अधिकाऱ्यांनी‎ मूळ आस्थापनेत जाण्याची तयारी ठेवली आहे.‎