आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादेशाला हुकूमशाही पद्धतीने चालवू पाहणाऱ्या केंद्रातील भष्ट्राचारी भाजप सरकार व राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार विरोधात मंगळवारी सायंकाळी 7 वाजता भव्य मशाल मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
या मशाल मोर्चामध्ये कॉंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, जनता दल, कम्युनिस्ट पक्ष, समाजवादी पार्टी, शेकाप, आरपीआय (कवाडे गट), सीपीआय, भारतीय कामगार सेना, जनता दल सेक्युलर तसंच काही सामाजिक संघटना सहभागी होणार आहेत.
मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप म्हणाले की, आज देशात अराजकतेचे वातावरण निर्माण करण्यात आले आहे. देशभर एक अघोषित आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहेत. देशात महिला सुरक्षित नाहीत. देशात सामाजिक अशांतता, दिवसेंदिवस बाहेर येणारे आर्थिक घोटाळे, वाढती महागाई आणि बेरोजगारी याने संपूर्ण देश ढवळून निघाला आहे. असा आरोपही जगताप यांनी यावेळी केला.
प्रभू राम सर्वांच्या मनात
भाई जगताप म्हणाले की, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अयोध्येला प्रभू श्री रामचंद्रांच्या दर्शनाला गेले आहेत. याबद्दल आम्हाला काहीच आक्षेप नाही. प्रभू राम सर्वांच्या मनात आहेत. आमच्या सुद्धा मनात आहेत. पण आम्ही त्यांचे कधीही मार्केटिंग केले नाही. त्यांनी खुशाल प्रभू रामाच्या दर्शनाला जावे. पण त्या आधी महाराष्ट्रात जे रावण बोकाळले आहेत त्यांचे काय ? त्यांचा आधी बंदोबस्त करा.
अयोध्येला गेलेल्या लोकांचा खर्च कुठून?
भाई जगताप म्हणाले की, महाराष्ट्रात दिवसेंदिवस ज्या सामाजिक अशांतता बिघडवणाऱ्या घटना घडत आहेत, जी दंगलसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे, त्याचा बंदोबस्त करण्याकडे पण लक्ष द्या. तसेच ज्या प्रकारे मुख्यमंत्री 40 आमदारांना घेऊन गुवाहाटीला पिकनिकला गेले होते. त्याच प्रमाणे ते अयोध्येला 10हजार लोकांचा लवाजमा घेऊन गेले आहेत. या 10 हजार लोकांना लागणारा खर्च कोण करतोय? हा पैसा कुणाचा आहे, हा पैसा तुमचा आमचा सामान्य जनतेचा पैसाच आहे, त्याचा हिशोब कोण आणि कधी देणार, असा आमचा मुख्यमंत्र्यांना सवाल आहे, असेही ते पुढे म्हणाले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.