आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्वपक्षीय बैठक घेतली. या बैठकीत मोदी म्हणाले होते की, कोरोना लसीसाठी जास्त काळ प्रतीक्षा करण्याची गरज भासणार नाही, ही लस काही आठवड्यांत तयार होईल. या लसीची किंमत राज्य आणि केंद्र मिळून ठरवले. मात्र आता यावर राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिकांनी प्रश्न उपस्थित केला आहे. प्रत्येक भारतीयांना लस मोफत द्या असे मलिक म्हणाले आहेत.
नवाब मलिक म्हणाले की, 'पंतप्रधानांनी सर्वपक्षीय बैठक घेतली आणि आता ते म्हणत आहेत की राज्य व केंद्र किंमत ठरवेल, ते कसे असेल? बिहारमध्ये त्यांनी लसीकरण मोफत मिळेल असे आश्वासन दिले. आमची मागणी आहे की प्रत्येक भारतीयाला विनाशुल्क लस मिळायला हवी.'
PM held all-party meeting & now they're saying State & Centre will decide the price, how can it be? In Bihar, they gave assurance that vaccination will be free. We demand vaccine should be given to each Indian free of cost: Maharashtra Minister & NCP leader Nawab Malik
— ANI (@ANI) December 5, 2020
#COVID19 pic.twitter.com/Y57mqUueC1
पंतप्रधान मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फ्रेंसमध्ये म्हटले होते की, 'लसीच्या किंमतीचा प्रश्न देखील स्वाभाविक आहे. केंद्र या संदर्भात राज्यांशी बोलत आहे. सार्वजनिक आरोग्यास प्राधान्य देत निर्णय घेण्यात येईल. भारत आज त्या देशांपैकी एक आहे जिथे दररोज अधिक चाचण्या केल्या जात आहे. रिकव्हरीचे प्रमाण जास्त आणि मृत्यूचे प्रमाण कमी अशा देशांपैकी भारत एक आहे. कोरोनाविरुद्ध आम्ही ज्या प्रकारे लढा दिला त्यावरून प्रत्येक देशवासियाची इच्छा दर्शविली जाते. विकसित देशांच्या तुलनेत भारताने युद्ध चांगल्या पद्धतीने लढले आहे.'
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.