आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराउद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात कोकणावर सर्वाधिक अन्याय झाला. युतीच्या काळात आम्ही कोकणासाठी ज्या योजना आणल्या होत्या, गेल्या अडीच वर्षांत त्या सर्व योजना बंद करण्यात आल्या, असा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.
आज गोरेगाव येथे स्वराज्य भूमी कोकण महोत्सवाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात फडणवीस बोलत होते.
कोकणात मोठे प्रोजेक्ट आणू
फडणवीस म्हणाले, आश्चचर्याची गोष्ट म्हणजे ज्यांना कोकणाने भरभरून दिले, त्यांच्याच कार्यकाळात कोकणावर अन्याय झाला, हे दुर्दैव आहे. मात्र, आता आम्ही कोकणाच्या विकासाला गती देणार आहोत. कोकणात आम्ही मोठमोठे प्रोजेक्ट आणू. कोकणात नियोजित रिफायनरी प्रोजेक्ट आम्ही आणून दाखवू.
रिफायनरी प्रकल्प आणणारच
फडणवीस म्हणाले, आम्ही कोकणात जो रिफायनरी प्रकल्प आणणार आहे, तो ग्रीन रिफायनरी प्रकल्प असेल असा आमचा आग्रह आहे. यामुळे कोकणातील प्रदूषण वाढणार नाही. ग्रीन रिफायनरी प्रकल्पातून कोणतेही उस्तर्जन नाही, असे तंत्रज्ञान वापरणार आहोत. 5 हजार एकरात यासाठई फक्त ग्रीनरी तयार करावी लागेल, असा नियमही करण्यात आला आहे.
रिफायनरीमुळे प्रदूषण नाही
फडणवीस म्हणाले, रिफायनरी प्रकल्पामुळे कोकणात 1 लाख लोकांना थेट रोजगार आणि 5 लाख लोकांना अप्रत्यक्ष रोजगार मिळण्याची शक्यता आहे. पण, काही लोकांनी आरोप की रिफायनरीमुळे कोकणात आंबाच येणार नाही. पण हे खोटे आहे. गुजरातला 1 नंबरची रिफायनरी आहे. तरीही कोकणच्या आंब्याच्या खालोखाल गुजरातचा आंबा देश-विदेशात निर्यात होतो. जगभरात तो जातो. त्यामुळे काही लोकांना कोकणाचा विकास नकोय. त्यांना कोकण मागास ठेवून, मतं घेऊन राजकारण करायचं आहे.
कोकणी माणसाच्या हाताला काम दाखवू
फडणवीस म्हणाले, गेल्या अडीच वर्षांत कोकणावर अन्याय झाला. यामुळेच आता कोकणात आम्ही रिफायनरी करून दाखवू. कोकणी माणसाच्या हाताला काम देऊन दाखवू, हा आमच्या सरकारचा निर्धार आहे. महोत्सवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, फणस जसा बाहेरून काटेरी व आतून गोड असतो, त्याचप्रमाणे कोकणातला माणूस आहे. मात्र, हा माणूस गोड असला तरी एकदा ठरवले की, तो आरपारची लढाईही लढतो.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.