आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर रेणू शर्मा यांनी बलात्काराचे गंभीर आरोप केले होते. यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. भाजपकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणीही झाली. मात्र आता धनंजय मुंडेंना दिलासा मिळाला आहे. या महिलेने मुंडेंविरोधातील तक्रार मागे घेतली. आता भाजपकडून धनंजय मुडेंवर खोटे आरोप करणाऱ्या महिलेवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
धनंजय मुंडे यांच्यावर कारवाई करावी यासाठी भाजप महिला मोर्चातर्फे आंदोलनही करण्यात आले होते. परंतु आता बलात्काराची तक्रार मागे घेतल्यानंतर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी मात्र संतप्त प्रतिक्रिया दिली. तसेच तक्रार मागे घेणाऱ्या रेणू शर्मांवर खोटे आरोप केल्याप्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
'अशाप्रकारामुळे ज्या महिला खरंच पीडित महिला आहेत त्यांच्याकडे बघण्याचा समाजाचा दृष्टीकोन बदलतो. सरकारी यंत्रणांचा बराच वेळ या प्रकरणात गेला. अशा प्रकारच्या आरोपांमुळे एखाद्याचे वैयक्तिक आयुष्यासह राजकीय जीनवही उद्ध्वस्त व्हायला वेळ लागत नाही. त्यामुळे खोटे आरोप करणाऱ्या महिलेवर गुन्हा दाखल करावा', अशी मागणी भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी केली आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.