आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवरुन किसान सभेचा लाँग मार्च आज मुंबईत धडकणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र आता मोर्चाचे शिष्टमंडळ मुंबईत जाणार नाही तर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी मोर्च्याच्या ठिकाणी यावे, अशी भूमिका माजी आमदार जे. पी. गावित यांनी घेतली आहे.
आज आंदोलकांनी बैठकीत जाण्यास नकार दिला आहे. मोर्चा घेऊन मुंबईत जाणार मात्र चर्चेसाठी मंत्र्यांनी यावे, असे गावित यांनी म्हटले आहे. संपकरी सरकारी कर्मचाऱ्यांच्या बैठकीला सरकारने प्राधान्य दिले, मात्र शेतकऱ्यांच्या वेदनेकडे बघायला सरकारला वेळ नाही, असे आंदोलकांचे म्हणणे आहे.
सध्या हा मोर्चा इगतपुरी तालुक्यातील घाटन देवी गावात दाखल झाला आहे. घाटन देवीतून हा मार्च आज कसारा बायपासमार्गे पुढे प्रवास सुरु करणार आहे. काल या लाँग मार्चवरुन विधानसभेतही वातावरण तापलेले पाहायला मिळाले. विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले की, सरकारने शेतकऱ्यांशी चर्चा करावी, शेतकरी एवढ्या रणरणत्या उन्हात मोर्चा काढत आहेत. नाशिकवरुन ते पायी मुंबईच्या दिशेने चालत येत आहेत. त्यामुळे सरकारने तात्काळ या मुद्यावर मार्ग काढावा.
काय आहेत मागण्या?
या प्रमुख मागण्यांसह इतर मागण्यांसाठी शेतकऱ्यांचा हा मार्च मुंबईच्या दिशेने रवाना झाला आहे.
मंत्री दादा भुसे म्हणाले की, किसान सभेच्या शिष्टमंडळाची उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक होणार आहे. या बैठकीला विविध खात्यांचे सचिव उपस्थित राहणार असल्याची माहिती नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी दिली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.