आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा100 कोटी वसुली प्रकरणामुळे राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मंत्रिपद सोडावे लागले. या प्रकरणात चांदिवाल आयोगाचे चौकशीचे कामकाज पूर्ण झाले असून सचिन वाझे आणि माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्या आरोपांमध्ये कोणतेही तथ्य आढळून आले नसल्याचे नमूद करण्यात आले. त्यामुळे अनिल देशमुखांना क्लिन चिट मिळणार असल्याची माहिती आहे.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी रुपये वसुलीचा आरोप केला होता. या प्रकरणी राज्य सरकारने चांदिवाल आयोगाची स्थापना केली. न्युज 18 लोकमतच्या वृत्तानुसार, या आयोगाचे कामकाज पूर्ण झाले आहे. २३ मार्चला सीलबंद अहवाल तयार होणार आहे. आयोगाचे वकील शिशिर हिरे यांनी युक्तीवाद केला आहे.
सरकार दरबारी आरोपांची नोंद नाही
परमबीर सिंग आणि सचिन वाझे यांचे आरोप वैध नाहीत. सरकार दरबारी १०० कोटी वसुलीचे कुठेही आरोपाची नोंद नसल्याने अनिल देशमुख यांना दिलासा मिळू शकतो, असा निष्कर्ष या अहवालावरून काढला जात आहे. त्यामुळे आयोगाच्या अहवालानंतर अनिल देशमुख यांना क्लिन चिट मिळेल की नाही हे येत्या काळात स्पष्टच होणार आहे.
असा आहे युक्तिवाद
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.