आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोनाचा परीणाम:​​​​​​​कर्मचाऱ्यांची कमतरता लवकरच बनू शकते आव्हान, 21 सेक्टर्समध्ये दिसेल परीणाम

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या काळात देशात कामगारांच्या कमतरतेचे आव्हान समोर येऊ शकते. 21 सेक्टरमध्ये केलेल्या सर्वेक्षणात अशी माहिती समोर आली आहे.

ब्लू-कॉलर वर्क फोर्सची कमतरता असू शकते
जॉब मार्केटच्या तज्ञांचे म्हणणे आहे की ब्लू-कॉलर कामगारांची कमतरता लवकरच विविध क्षेत्रांसाठी एक आव्हान बनू शकते. कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असताना आणि राज्यांमध्ये लादण्यात आलेले निर्बंध यामुळे या उद्योगाला आधीच कर्मचाऱ्यांच्या कमतरतेचा सामना करावा लागत आहे. स्टाफिंग रिसोर्स फर्म टीमलीज सर्व्हिसेसच्या सर्वेक्षणानुसार, 21 क्षेत्रातील सुमारे 850 कंपन्यांपैकी निम्म्या कंपन्यांनी पुढील तीन महिन्यांत ब्लू-कॉलर मॅनपावर नियुक्त करण्याची योजना आखली आहे.

अनेक क्षेत्रांमध्ये कर्मचाऱ्यांची कमतरता आहे
अनेक क्षेत्रे, विशेषत: मॅनीफॅक्चरिंग, अभियांत्रिकी, बांधकाम, रिअल इस्टेट, आरोग्यसेवा आणि फार्मास्युटिकल्स यांना कामगारांच्या कमतरतेचा सामना करावा लागत आहे. टीमलीज आणि इंडस्ट्रीच्या अंदाजानुसार, सध्याच्या उद्योगांमध्ये कामगारांची कमतरता 15 ते 25% पर्यंत आहे. कोविडची ताजी लाट देशात पसरल्याने पुढील काही महिन्यांत ही दरी आणखी वाढू शकते.

कामगार एकत्रीकरण हे एक आव्हानात्मक काम आहे
टीमलीज सर्व्हिसेसचे असिस्टंट व्हाईस प्रेसिडेंट अमित वडेरा म्हणाले की, येत्या काही महिन्यांत मजुरांची जमवाजमव करणे हे आव्हानात्मक काम असू शकते. स्थलांतरित मजूर आधीच त्यांच्या घरी परतण्याच्या तयारीत बसले आहेत. त्यामुळे सध्या कामगारांची कमतरता आहे. मोठ्या शहरांमध्ये वेगाने पसरणाऱ्या संसर्गामुळे हे संकट अधिक गडद होऊ शकते.

निर्बंधांमुळे प्रकरण आणखी वाईट होऊ शकते
वडेरा म्हणाले की, फास्ट मूव्हिंग कंझ्युमर गुड्स (FMCG), ई-कॉमर्स आणि लॉजिस्टिक्स यांसारख्या क्षेत्रातही, जिथे कामगार पुरवठा मागणीपेक्षा किरकोळ जास्त आहे, संक्रमणांची संख्या आणि आंतर-राज्य निर्बंध आणखी बिघडू शकतात. मात्र, कंपनीचे काही शीर्ष अधिकारी आणि अर्थशास्त्रज्ञ आशावादी आहेत.

त्यांचे म्हणणे आहे की, सर् लोक आणि सरकार गेल्या दोन लाटेंच्या तुलनेत चांगले काम करत आहेत आणि उपलब्ध मॅनपावर टिकवून ठेवण्यासाठी अनेक उपाय करत आहेत.

कंपन्या चांगली तयारी करत आहेत
महिंद्रा समूहाचे मुख्य अर्थशास्त्रज्ञ सच्चिदानंद शुक्ला म्हणाले, 'आम्ही या वेळी सरकार, व्यवसाय आणि व्यक्ती या नात्याने चांगले तयार आणि सक्षम आहोत. परंतु अर्थव्यवस्थेचा आणि लोकसंख्येचा आकार पाहता, हजारो क्षेत्रांवर-विशेषत: इनफॉर्मल सेक्टरमध्ये, अजूनही काही काळ प्रभाव राहील. शिवाय, शहरांमध्ये ज्या प्रकारचा आधार आणि नोकऱ्या उपलब्ध आहेत, त्या खेड्यांमध्ये मिळत नाहीत आणि परिणामी, कामगारांना शहरांकडे परतावे लागेल.

अनेक कंपन्या त्यावर उपाय करत आहेत
शुक्ला म्हणाले की, स्थानिक पातळीवर उपलब्ध पर्याय (मजूर) दीर्घकाळात प्रभावी ठरत नाहीत हेही आम्ही आमच्या गटात पाहिले आहे. थर्मेक्स, JSW स्टील आणि फोर्ब्स मार्शलसह अनेक कंपन्यांमध्ये कामगार टिकवून ठेवण्यासाठी वेतन, आरोग्य कव्हरेज आणि रोजगार विमा, उपस्थिती भत्ता (दैनंदिन येण्या-जाण्याच्या पगाराव्यतिरिक्त अतिरिक्त रोख प्रदान), मोबिलायझेशन खर्च, मजुरीला उत्पादनाशी संबधीत प्रोत्साहनांनी जोडण्यासारखी नवीन स्कीम सुरू केली आहे.

बातम्या आणखी आहेत...