आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नव्या महामंडळांना प्रत्येकी 50 कोटी:अर्थसंकल्प मांडताना देवेंद्र फडणवीसांची घोषणा, कल्याणकारी योजनांसाठी खर्च होणार

21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना उपमुख्यमंत्री वेगवेगळ्या समाजांच्या आर्थिक विकासासाठी नव्या महामंडळांच्या उभारणीसह त्यांच्यासाठी प्रत्येकी 50 कोटी रुपयांच्या तरतुदीची घोषणा केली. या महामंडळांच्या माध्यमातून विविध कल्याणकारी योजना राबवल्या जातील.

कल्याणकारी योजनांसाठी महामंडळांना प्रत्येकी 50 कोटी

असंघटित कामगारांसाठी महाराष्ट्र राज्य असंघटित कामगार कल्याण मंडळ, लिंगायत समाजातील तरुण सुशिक्षित बेरोजगार व नवोद्योजकांना स्वयं उद्योग अर्थसहाय्य देण्यासाठी जगतज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ, गुरव समाजासाठी संत काशीबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळ, रामोशी समाजासाठी राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ, वडार समाजासाठी पैलवान कैलासवासी मारुती चव्हाण वडार आर्थिक विकास महामंडळ यांची महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय विकास महामंडळअंतर्गत स्थापना करण्यात येईल. ही महामंडळे विविध कल्याणकारी योजना राबवतील त्यासाठी प्रत्येकी 50 कोटी रुपये अधिकृत भाग भांडवल देण्यात येईल.

महात्मा फुले जन आरोग्य योजनेची मर्यादा 5 लाख

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेत उपचाराची मर्यादा वार्षिक दीड लाखावरून 5 लाख रुपये करण्यात येत असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत अर्थसंकल्प सादर करताना केली. महिलांच्या आरोग्यासाठी ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ अभियानांतर्गत चार कोटी महिला व मुलींची आरोग्य तपासणी व औषधोपचार करण्यात येतील. (वाचा पूर्ण बातमी)

देवेंद्र फडणवीसांनी अर्थसंकल्पात मांडले 'पंच अमृत'

यंदाचा राज्याचा अर्थसंकल्प हा अमृतकाळातील पहिलाच अर्थसंकल्प असून तो ‘पंचामृत’ ध्येयावर आधारित असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

सत्तांतरानंतर आज शिंदे-फडणवीस सरकार प्रथमच आपला अर्थसंकल्प सादर करत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्याकडे अर्थविभागाचा कारभार आहे. त्यामुळे अर्थमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचाही हा पहिलाच अर्थसंकल्प आहे. (वाचा पूर्ण बातमी)

बातम्या आणखी आहेत...