आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करास्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांबाबत सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आले आहेत, यावर विश्लेषण राज्य निवडणूक आयोग करेल; पण आम्ही या निवडणूकीत भाजपला रोखणार आहोत म्हणूनच महाविकास आघाडी एकत्र लढणार असल्याची महत्वपुर्ण माहिती राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज दिली. ते माध्यमांशी बोलत होते.
थोरा म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक घेण्याचे निर्देश दिले आहेत, त्यावर राज शासन म्हणून आम्ही सध्या तरी एकत्र बसलो नाही. पण मुंबईत, कोकणात पाऊस असतो या काळात निडवणूका कशा घेणार हा प्रश् आहे, पण राज्य निवडणूक आयोगाचा अधिकार असतो.
निवडणूक आयोग निर्णयाचे विश्लेषण करेल
निवडणूका घेण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आहे, त्याचे विश्लेषण राज्य निवडणूक आयोग करेल. निवडणूका लागल्या तर महाविकास आघाडी तयारच आहे. आम्ही कधीही निवडणूकीला घाबरलो नाही.
भाजपला सत्तेपासून दुर ठेवणार
आम्ही चांगल्या प्रकारे तयारी करीत आहोत. राज्यात सत्तेपासून आम्ही भाजपला दुर ठेवले आता स्थानिक स्वराज्य संस्थेतील निवडणूकांतही भाजपला सत्तेपासून दुर ठेवणे हा आमचा नारा आहे. त्यामुळे आम्ही एकत्रही लढणार आहोत असेही थोरात म्हणाले.
राज अल्टीमेटम देऊ शकत नाही
राज ठाकरे अल्टीमेटम देऊ शकत नाही. सरकारमधून कुणीही अल्टीमेटम देऊ शकत नाही. त्यादृष्टीने राज्य सरकारने पुर्ण काळजी घेतली. हे कायद्याचे राज्य आहे याच दृष्टीने आम्ही कार्य करीत आहोत असेही थोरात म्हणाले.
राज यांना भोंगा नव्हे राजकारण महत्वाचे
राज यांना भोंगा महत्वाचा नाही राजकारण महत्वाचे आहे. सरकार बॅकफूटवर गेले नसून सरकार भक्कम आणि खंबीर भूमिका घेत आहे. असे सांगतानाच सर्वोेच्च न्यायालयाचे निर्णय सर्वांनाच पाळावे लागत असतात. काकड आरती शिर्डी आणि त्र्यंबकेश्वरमध्ये थांबवल्याचे मला समजले राऊतांनी याबाबत ट्विट केले असेही ते म्हणाले.
महाराष्ट्रात जागरण गोंधळ, काकड आरती आदी सर्व कार्यक्रम चालतात. नियम सर्वांनाच लागू असतात पण या नियमांना अनुसरुन आपण चालायला आणि वागायला हवे असा सल्लाही त्यांनी दिला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.