आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातिरंगा रॅलीमुळे मविआ सरकारला अडचण का आली? हे सरकार आता तिरंग्याविरोधात झाले आज याची खंत वाटते आहे. तिरंगा म्हणजे भारताची ओळख शिवसेना राष्ट्रवाद विसरली का? असे म्हणत एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दिन ओवेसी यांनी शिवसेनेवर टीकास्त्र केले. आपण सर्व एकत्र येऊन काम करूयात, समाजाच्या यशासाठी एकत्र लढा असायला पाहिजे. असेही ते म्हणाले.
मुंबईत कलम 144 लागू केल्यावरून देखील ओवेसींनी टीकास्त्र केले ते म्हणाले की, एमआयएमची तिरंगा रॅली मुंबईत येऊ नये म्हणून ओमायक्रॉनच्या नावावर कलम 144 लागू करण्यात आली. जर राहुल गांधी मुंबई येणार असते तर जमावबंदी लागली असती का? असा सवाल देखीवल ओवेसींनी महाविकास आघाडी सरकारला विचारला आहे.
धर्मनिरपेक्षतेमुळे आपल्याला आरक्षण मिळालं का?
राज्यातील थ्री इन वन सरकार आरक्षण काय असते ते विसरली आहे. हे तीनही पक्ष दाबून खातात आणि स्वातंत्रलढ्यात सहभागी न झालेले राष्ट्रवाद सांगतात. मुस्लिमांनी शिक्षण घेऊ नये अशी अनेकांची भावना आहे, मुस्लिम शिक्षण का घेऊ शकत नाही? किती मुसलमान ग्रॅज्युएट झाले आहेत? असे म्हणत ओवसींनी मुस्लिम आरक्षणाची मागणी केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.