आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मुंबई पोलिसांच्या हाती मोठे यश आले आहे. महाराष्ट्र, तेलंगाणा आणि छत्तीसगडमध्ये 50 पेक्षा जास्त चोऱ्या केलेल्या एका टोळीचा मुंबई पोलिसांनी पर्दाफास केला. विशेष म्हणजे, या टोळीत एकाच कुटुंबातील सहा जणांचा समावेश आहे. ही टोळी ज्वेलरी शॉपमध्ये चोऱ्या करायची. पोलिसांनी आरोपींकडून 1 लाख 90 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत.
चोरीच्या एका घटनेनंतर या कुटुंबाबद्दल माहिती समोर आली
13 जानेवारीला कुरार परिसरातील मयुर ज्वेलर्समध्ये 10 तोळे दागिन्यांची चोरी झाली होती. यानंतर पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरू केला. दुकानाच्या मालकाने पोलिसांना सांगितले की, 13 जानेवारीला एक कुटुंब दागिने पाहण्यासाठी आले होते, ते निघून गेल्यावर चोरी झाल्याचे उघड झाले. दुकानाच्या सीसीटीव्हीमध्ये चोरीही घटना कैद झाली होती.
याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आणि 20 दिवसानंतर आरोपींना पुण्यातून अटक केली. रेखा वाणी (45), मुलगा अक्षय वाणी(19), दुसरा मुलगा शेखर वाणी(28), सुन रेणुका वाणी(23) आणि नरेंद्र साळुंखे(35) ला अटक केली आहे. यातील, रेखा वाणीचा पती हेमराज आणि नरेंद्र साळुंखेची पत्नी फरार आहे. यांचा शोध सुरू आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.