आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबईतील साकीनाका बलात्कार प्रकरणाने संपूर्ण राज्य हादरुन गेले आहे. विरोधी पक्षांकडून विद्यमान सरकारवर हल्लाबोल सुरुच आहे. या घटनेतील पीडित महिलेचा काल मुंबईतील एका खाजगी रुग्णालयात मृत्यू झाला आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रीय महिला आयोगाने संबंधित प्रकरणाची दखल घेतली आहे. आयोगाने सदरील पीडित कुटुंबियांची भेट घेत त्यांच्याकडून घटनेची माहिती जाणून घेतली.
राष्ट्रीय महिला आयोगाने या प्रकरणावरुन ठाकरे सरकावर कडक ताशेरे ओडले आहेत. हे सरकार महिलांच्या बाबतीत अतिशय असंवेदनशील असल्याचे म्हटले आहे. कायदेव्यवस्था सरकारच्या नियंत्रणात नसल्यामुळेच या घटना घडत असल्याचा आरोपही आयोगाने केला आहे. आयोगाकडून डॉक्टरांचा जबाब नोंदवण्यात येणार असून पोलिस वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटून विस्तृत माहिती घेणार असल्याचे म्हटले आहे.
हे सरकार महिलांच्या बाबतीत असंवेदनशील
राज्य सरकारने गेल्या दोन वर्षापासून राज्य महिला आयोगाची स्थापना का केली नाही असा सवाल आयोगाने उपस्थित केला आहे. एकीकडे, संपूर्ण देशात महिला आयोगाची स्थापना करण्यात आली आहे. राज्यात महिला आयोग नसल्यामुळे पीडित महिला कुठे न्याय मागणार? जर राज्यात आयोगाची स्थापना झाली असती तर या पीडित महिलेला न्याय मिळाला असता असेही आयोगाने म्हटले आहे. राज्य सरकार महिलांच्या बाततीत संवेदनशील नसून त्यांना महिलेची कोणतीच चिंता नसल्याचा आरोप ही त्यांनी यावेळी केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.