आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
महाराष्ट्रात सरकार चालत नसून सर्कस चालू आहे, या केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या टिकेला राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी प्रत्युत्तर दिले आहे. 'रिंगमास्टरच्या हंटरवर चालणाऱ्या सरकारचे मंत्री लोकशाहीने चालणाऱ्या सरकारला 'सर्कस' म्हणत आहेत', अशा शब्दात नवाब मलिक यांनी राजनाथ सिंह यांच्या टीकेला उत्तर दिले.
महाराष्ट्र में लोकतांत्रिक ढंग से चलने वाली सरकार अच्छा काम कर रही है
— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) June 9, 2020
Covid 19 को लेकर ICMR ने मुम्बई मॉडल की प्रशंशा की है
केंद्रीय मंत्री @rajnathsingh जी रिंग मास्टर के हंटर से चलने वाली सरकार के मंत्री लोकतांत्रिक ढंग से चलने वाली सरकार को सर्कस बोल रहे हैं।
"अनुभव के बोल "
राजनाथ सिंग यांच्या टिकेला उत्तर देताना नवाब मलिक म्हणाले की, 'महाराष्ट्रात लोकशाही पद्धतीने चालणारे सरकार चांगले काम करत आहे. कोव्हिडबाबत मुंबई मॉडेलचे आयसीएमआरने कौतुक केले आहे. केंद्रीय मंत्री राजनाथ सिंहजी, रिंगमास्टरच्या हंटरवर चालणाऱ्या सरकारचे मंत्री लोकशाहीने चालणाऱ्या सरकारला सर्कस म्हणत आहेत. अनुभवाचे बोल...' असे ट्वीट नवाब मलिक यांनी केले आहे.
राजनाथ सिंह यांनी सोमवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे महाराष्ट्र जनसंवाद रॅलीला संबोधित केले होते. यादरम्यान त्यांनी सोनू सूदच्या कामाचे कौतुक केले. ते म्हणाले की, टीव्हीवर पाहिले की अभिनेता सोनू सूद या संकटात अडकलेल्या कामगारांना मदत करत आहे. पण संकटात अडकलेल्या मजुरांना मदत करणार्या व्यक्तीवर काही जण टीका करत आहेत. महाराष्ट्रात सध्या तीन पक्षांचे सरकार आहे. ते पाहून असे वाटते की, सरकारच्या नावाखाली सर्कस सुरू आहे. महाराष्ट्र शासनाकडे ज्या प्रकारची दूरदृष्टी असायला हवी, तीच दिसत नाही.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.