आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशिंदेंकडून गर्दी करत दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू आहे. माणसे मेळाव्यासाठी आणली जाताय, त्यांना काहीच माहिती नाही कुठे चाललो असे म्हणत शिवसेनेच्या उपनेत्या किशोरी पेडणेकर यांनी शिंदे गटावर केला आहे.
काय म्हणाल्या पेडणेकर?
शिवाजी पार्कवर आलेली गर्दी ही बाळासाहेबांवर प्रेम करणारी गर्दी आहे, असे सांगतानाच महाराष्ट्रात 3 मेळावे होत आहेत. एक पंकजा मुंडेंचा मेळावा हा पारंपरिक आहे. तर दुसरा आपला मेळावा आहे. तिसरा मेळ्याव्यात माणसे आणावी लागतात आपल्याकडे लोक येत आहे. हा विश्वास आहे जनतेचा तो गटप्रमुख आणि शाखाप्रमुखाची काय ताकद आहे हे सर्व येणाऱ्या निवडणुकीत दिसून येईल् असे किशोरी पेडणेकरांनी म्हटले आहे.
गद्दारांना शिवसैनिक संपवणार
दर 10 ते 15 वर्षांनी प्रत्येकाला उर्मी येते आणसि ते शिवसेनेवर थुकत निघून जातात. मात्र, शिवसैनिक सर्वांना शांत करतात येणाऱ्या काळात उद्धव ठाकरे जे बोलतात मते करतात हे सर्वांना दिसून येईल. तुमच्या माथ्थ्यावरचा गद्दारीचा शिक्का पुन्हा पुसणार नाही. हे आरोग्यमंत्र्यांचा नामोनिशाण संपवावे लागेल, असे म्हणत तानाजी सावंत यांच्यावर किशोरी पेडणेकरांनी टीकास्त्र डागले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.