आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराउद्धव ठाकरे यांना कान चावणारे लोक जवळ लागतात. अनिल परब, सुभाष देसाई आणि विनायक राऊत असे लोक त्यांना लागतात. जोपर्यंत हे बडवे बाजूला जात नाहीत, तोपर्यंत उद्धव ठाकरेंचे काही खरे नाही, असे म्हणत बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे नेते रामदास कदम यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्या समर्थकांवर टीका केली आहे. कदम म्हणाले की, अनिल परब यांना आत टाकले पाहिजे. यासाठी का उशीर होत आहे हे मला कळत नाही. माझ्या योगेशला बाजूला ठेवून दापोली मंडणगड नगरपंचायत परब यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या घशात घातली. ठाकरेंना अशाच प्रकारची माणसे लागतात.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.