आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिंतेचे कारण नाही?:मविआत सगळे आलबेल; शरद पवार, उद्धव ठाकरेंमध्ये आघाडीच्या ऐक्यावर सकारात्मक चर्चा- संजय राऊत

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आता पुन्हा सत्तारूढ होण्यासाठी ‘बी प्लॅन’वर काम करत आहे. शरद पवारांची भाजप अनुकूल भूमिका हा त्याचाच भाग असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. भाजपला अनुकूल वक्तव्ये करणाऱ्या शरद पवारांच्या खेळीमुळे अस्वस्थ झालेले उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी रात्री ‘सिल्व्हर ओक’वर धाव घेतली. तिथे उद्धव, शरद पवार यांच्यासह खासदार सुप्रिया सुळे व संजय राऊत या चौघांमध्ये सुमारे सव्वा तास खलबते झाली. यातील चर्चेचा तपशील गोपनीय ठेवण्यात आला आहे. मात्र, आज पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी या भेटीबाबत महत्त्वाची माहिती दिली.

गैरसमज पसरवले जात आहेत

संजय राऊत म्हणाले की, शरद पवारांसोबत उद्धव ठाकरे यांची प्रदीर्घ अशी बैठक झाली. बैठकीत राजकीय घडामोडींवर, भविष्याची दिशा ठरवण्यावर दोन्ही नेत्यांमध्ये अत्यंत सकारात्मकचर्चा झाली. मविआचे ऐक्य अबाधित ठेवणे हा चर्चेचा अंजेडा होता. महाविकास आघाडीबाबत जाणुनबुजून गैरसमज पसरवले जात आहेत. महाविकास आघाडी घट्ट आहे. काँग्रेसशीही आमचा संवाद सुरू आहे. महाविकास आघाडीतील सर्व घटकपक्षांमध्ये चांगला डॉयलॉग आहे. तसेच, काँग्रसचे महासचिवही येत्या काही दिवसांत उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत, अशी माहिती संजय राऊतांनी दिली.

अजित पवारांना ईडीने त्रास दिला

महाराष्ट्रा राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्रात अजित पवार व त्यांच्या पत्नीचे नाव वगळले आहे. त्यामुळे ईडीने अजित पवारांना क्लीन चीट दिला का?, अशीही चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. तसेच, अजित पवार लवकरच भाजपमध्ये जाणार, असाही दावा करण्यात येत आहे. त्यावर संजय राऊत म्हणाले की, या प्रकरणात ईडीनेच अजित पवार यांच्या जरंडेश्वर साखर कारखान्यावर धाडी टाकल्या आहेत. अजित पवार यांना व त्यांच्या कुटुंबीयांना मानसिक त्रास दिला. त्यांचा छळ केला. साखर कारखाना जप्त केला. अजित पवारांना बदनाम करण्याचे काम केले. त्याच ईडीने आता अजित पवारांचे नाव वगळले आहे. यातून विरोधकांविरोधात भाजप केंद्रीय यंत्रणांचा कसा गैरवापर करते, हे दिसून येते.

चंद्रकांत पाटलांना हाकलून द्या

संजय राऊत म्हणाले, बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल चंद्रकांत पाटील यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केले. नंतर खुलासा करुन पलटी मारली. केवळ खुलाशावर आमचे समाधान होणारे नाही. चंद्रकांत पाटलांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली पाहीजे. मी असे बोललोच नाही, असे म्हणत चंद्रकांत पाटील आता टोप्या फिरवत आहेत. दुर्दैव म्हणजे शिंदे गटाने याचा साधा निषेधही नोंदवली नाही. बाळासाहेबांचा अपमान करणाऱ्यांसोबत ते मांडीला मांडी लावून बसले आहेत. मिंधे गटाला आता बाळासाहेब ठाकरेंचे नाव घेण्याचा अधिकार नाही. मिंधे गटाचा हा लाचारीपणा, लाळघोटेपणा, मिंधेपणा आहे. महाराष्ट्राला त्यांची लाज वाटत आहे.

संबंधित वृत्त

शरद पवारांचा B प्‍लॅन:आधी राहुल गांधींना सुनावले, आता उद्धवबाबतही नाराजी, शिंदेंचे 16 आमदार अपात्र ठरल्यास भाजपला पाठिंब्याची चर्चा

स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अवमान, मोदींची पदवी, अदानींची जेपीसी चौकशी, ईव्हीएम या मुद्द्यांवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेस व उद्धव सेनेशी विसंगत भूमिका घेतली. त्यामुळे महाविकास आघाडीत दुफळी निर्माण झाली. शिवसेनेत फूट पडल्याने सत्तेतून पायउतार व्हावे लागलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आता पुन्हा सत्तारूढ होण्यासाठी ‘बी प्लॅन’वर काम करत आहे. शरद पवारांची भाजप अनुकूल भूमिका हा त्याचाच भाग असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. पवार याचे खंडन करत असले तरी मित्रपक्षांना मात्र त्यांच्या खेळीची धास्ती वाटतेय. यापूर्वी सावरकरांच्या मुद्द्यावर पवारांनी राहुल गांधींचे कान टोचले, आता उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपद सोडताना आम्हाला विचारले नव्हते, अशी वक्तव्ये करून पवार आघाडीतील मतभेद चव्हाट्यावर आणत आहेत. वाचा सविस्तर