आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तीकांत दास म्हणाले की, चांगला पाऊस पडेल या अपेक्षेने गावांची मागणी कायम राहील. आज सकाळी त्यांनी अचानक दहा वाजता भाषण देण्याचे ठरवले. दास म्हणाले की कोविड निर्बंध आणि बंदी असूनही व्यवसायांनी स्वत: ला जिवंत ठेवले आहे. दास म्हणाले की, एप्रिलच्या चलनविषयक धोरण समितीत आरबीआयच्या अंदाजानुसार कोणत्याही मोठ्या बदलांची अपेक्षा करु नका.
अर्थव्यवस्थेवर मोठ्या प्रमाणात परीणाम झाला आहे
शक्तिकांत दास म्हणाले की कोरोनाच्या दुसर्या लाटेचा अर्थकारणावर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे. रिझर्व्ह बँकेकडून या परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवले जात आहे. दुसर्या लाटेच्या विरूद्ध मोठ्या पाऊलांची आवश्यकता आहे. आरबीआय संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. गव्हर्नर म्हणाले की, कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर अर्थव्यवस्था सुधारत होती, परंतु दुसर्या लाटेने पुन्हा एकदा संकट निर्माण केले आहे. सरकार लसीकरणाला वेग देत आहे. जागतिक अर्थव्यवस्थेत सुधारणा होण्याचे संकेत आहेत. भारताबद्दल बोलायचे झाले तर भारतीय अर्थव्यवस्थाही दबावातून सावरताना दिसत आहे. चांगला मान्सून ग्रामीण भागातील मागणीला चालना देईल अशी अपेक्षा आहे.
उत्पादन क्षेत्रातील मंदी कमी होत आहे
ते म्हणाले की उत्पादन क्षेत्रातील मंदीही कमी होत आहे. एप्रिलमध्ये वाहन नोंदणींमध्ये घट झाली असली तरी ट्रॅक्टर सेगमेंट वाढीस लागला आहे. शक्तिकांत दास म्हणाले की कोविड -19 च्या दुसर्या लाटेविरूद्ध व्यापक पावले उचलण्याची गरज आहे. कोविड विरुद्ध भारताने आपला लढा आक्रमकपणे सुरू केला आहे. आरबीआय देखील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. आरबीआयच्या 200 पेक्षा जास्त अधिकाऱ्यांसाछी जे घरापासून दूर काम करतात, त्यांना क्वारंटाइन फॅसिलिटी सुरू राहिल. आतापर्यंत उत्पादन कार्यात मोठा अडथळा निर्माण झाला नाही.
35,000 कोटींची सिक्योरिटीज खरेदी करणार आरबीआय
शक्तिकांत दास यांच्यानुसार, 35,000 रुपयांची गव्हर्मेंट सिक्योरिटीजच्या खरेदीचा दुसरा टप्पा 20 ला सुरू करण्यात येईल. इमरजेंसी आरोग्य सेवेसाठी 50,000 कोटी रुपये दिले जातील. याशिवाय लवकरच प्राधान्य क्षेत्रात कर्ज व प्रोत्साहन देण्याची तरतूद करण्यात येणार आहे. याशिवाय बँक, कोविड बँक लोनही तयार करतील. राज्यांची ओव्हरड्राफ्ट सुविधा आता 34 दिवसांवरून 50 दिवस करण्यात आली आहे.
पुरवठा साखळी शेतीवर अवलंबून आहे
ते म्हणाले की, चांगला पाऊस होण्याच्या अपेक्षेने ग्रामीण मागणी चांगली होईल. संपूर्ण पुरवठा शृंखला कृषी क्षेत्राच्या बळावर अवलंबून आहे. कोविड -19 संकटातून बाहेर येण्याच्या भारताच्या क्षमतेबद्दल विश्वास ठेवणे आवश्यक आहे. गव्हरर्नर म्हणाले की परिस्थिती नाटकीयरित्या बदलली आहे. आता त्यास कॅलिब्रेटेड कारवाईसह मॅच करण्याची गरज आहे. गव्हरर्नर दास म्हणाले की आरबीआय आपली संसाधने सर्वच मोर्चांवर तैनात करेल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.