आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सव्वा रुपयाची लायकी:संजय राऊत चंद्रकांत पाटलांवर ठोकणार सव्वा रुपयांचा अब्रूनुकसानीचा दावा; म्हणाले - 'पाटलांची लायकी कोट्यवधी रुपयांची नाही, केवळ सव्वा रुपयांची'

मुंबई2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आम्ही फ्रिडम ऑफ स्पीच मानतो आणि म्हणूनच त्यांचे पत्र आम्ही आजच्या सामनामध्ये प्रसिद्ध केले आहे.

भाजप नेते किरीट सोमय्या हे शिवसेनेच्या नेत्यांवर विविध आरोप करत आहेत. यामुळे राज्यातील वातावरण हे तापलेले दिसत आहे. शिवसेना आणि भाजपमध्ये देखील शाब्दीत युद्ध सुरू आहे. दरम्यान शिवसेनेने सामना अग्रलेखातून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांवर टीका केली होती. याला पाटलांनी उत्तर देत राऊतांना पत्र लिहिले. या पत्रामध्ये त्यांनी पीएमसी घोटाळ्यासंदर्भात राऊतांवर आरोप केले होते. आता या आरोपांना संजय राऊतांनी उत्तर देत अब्रूनुकसानीचा दावा ठोकणार असल्याचे म्हटले आहे.

चंद्रकांत पाटलांनी शिवसेनेला लिहिलेल्या पत्राविषयी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलताना प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, 'चंद्रकांत पाटील यांनी आमच्या एका अग्रलेखावर पत्र पाठवले आहे. आम्ही त्यांच्यावर टीका केली. त्याच प्रमाणे त्यांना आमच्यावर टीका करण्याचे स्वातंत्र्य आहे. आम्ही फ्रिडम ऑफ स्पीच मानतो आणि म्हणूनच त्यांचे पत्र आम्ही आजच्या सामनामध्ये प्रसिद्ध केले आहे. जेणेकरून पाटलांची विषारी भाषा महाराष्ट्रातील जनतेला कळेल'

सव्वा रुपयांचा दावा ठोकणार
संजय राऊत पुढे बोलताना म्हणाले की, 'पीएमसी बँक घोटाळ्याविषयी पाटील यांनी पत्रात जे आरोप केलेले आहेत ते मला मान्य नाही. असले फालतू धंदे आम्ही करत नाहीत. असे घोटाळे केले असते तर एवढी वर्ष राजकात टीकलो नसतो. तसेच पाटील यांनी जे आरोप केले आहेत, त्यावरुन त्यांना येत्या चार दिवसांमध्ये कायदेशीर नोटीस पाठवली जाईल. मी त्यांच्यावर अब्रूनुकसानीचा दावा ठोकणार आहे. मात्र मी इतरांप्रमाणे कोट्यवधी रुपयांचा दावा ठोकणार नाही. मी पाटलांवर केवळ सव्वा रुपयांचा दावा ठोकणार आहे. कारण पाटलांची लायकी कोट्यवधी रुपयांची नाही. त्यांची किंमतच केवळ सव्वा रुपया आहे' अशी टीका राऊतांनी केली आहे.

काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील?
सामना अग्रलेखात संजय राऊतांनी चंद्रकांत पाटलांना ईडीचा अनुभव कुठून आला असा अग्रलेख लिहिला होता. यावरुन पाटील म्हणाले होते की, 'संजयराव तुमचा प्रश्न रास्त आहे. मला ईडीचा अनुभव नाही. तो येण्यासाठी भरपूर काळा पैसा असावा लागतो. आर्थिक गैरव्यवहार केले की, ईडीचा अनुभव येतो. तुमच्या पत्नीला पीएमसी बँक घोटाळ्यातून निघालेले पन्नास लाख रुपये मिळाले आणि या बेहिशेबी प्राप्तीबद्दल चौकशीसाठी ईडीने नोटीस बजावल्यानंतर तुम्ही हैराण झाला होता. अखेर बरीच धावपळ करून, ते पैसे परत देऊन प्रकरण मिटविण्याचा प्रयत्न तुम्ही धापा टाकत केलात. हे सर्व पाहिल्यावरून मी अंदाज बांधला की पन्नास लाखांसाठी एवढा त्रास होत असेल तर 127 कोटींसाठी नक्कीच फेस येणार. असे त्रैराशिक मांडून मी अंदाज बांधला, पण मला ईडीचा अनुभव नाही हे मात्र खरेच आहे.'

बातम्या आणखी आहेत...