आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी परीक्षा ऑफलाईन (लेखी परीक्षा) पद्धतीनुसार होणार असल्याची माहिती दिली आहे. दहावी आणि बारावीची लेखी परीक्षा ही ठरलेल्या तारखेनुसारच होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षेच्या वेळेतही महत्वाचे बदल करण्यात आले आहेत.
राज्यातील वाढत्या कोरोना संसर्गामुळे यंदा दहावी, बारावीच्या परीक्षा कोणत्या पध्दतीने घ्यावा असा प्रश्न होता. याविषयी पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या मनात शंका उपस्थित होत होत्या. दरम्यान आज शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाडांनी पालक व विद्यार्थ्यांना अनेक महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. दहावी व बारावीची परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच होणार आहे असे वर्षा गायकवाड यांनी जाहीर केले. इयत्ता दहावीची लेखी परीक्षा 29 एप्रिल ते 20 मे 2021 या कालावधीमध्ये होणार आहे. इयत्ता बारावीची परीक्षा 23 एप्रिल व 21 मे 2021 या कालावधीत घेतली जाणार आहे. यासोबतच यंदा परीक्षांसाठी स्वतंत्र केंद्रही असणार नाहीत. आपापल्या शाळेतच परीक्षा घेतल्या जाणार आहेत.
परीक्षेची वेळ
परीक्षा केंद्र
प्रात्यक्षिक परीक्षा
Hats off to our students who have braved this tough academic year. To help them, here are some concessions and guidelines for the final exams. For FAQs, referhttps://t.co/KX9sqYrmnj pic.twitter.com/BX0873EFVM
— Varsha Gaikwad (@VarshaEGaikwad) March 20, 2021
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.