आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजप विरुद्ध राष्ट्रवादी:शरद पवारांचे शेवटचे वाईट दिवस सुरू झाले, भाजप नेते अनिल बोंडे यांचे वादग्रस्त वक्तव्य

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले. या आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर भाजपचे नेते अनिल बोंडे यांनी चिथावणीखोर वक्तव्य केले आहे. शरद पवारांचे शेवटचे दिवस वाईट सुरू झाले आहे. फ्रान्सच्या राजासारखी थोडीफार पुनरावृत्ती राज्यात होत असल्याचे अनिल बोंडे यांनी म्हटले आहे.

एसटी कर्मचाऱ्यांनी आज दुपारी अचानकपणे शरद पवारांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी आंदोलन केले. यावेळी एसटी कर्मचाऱ्यांनी पवारांच्या घरावर चप्पल फेकल्या आणि दगडफेकदेखील केली होती. या घटनेने राज्यभरात खळबळ उडाली आहे. भाजप नेत्यांनी यावर प्रतिक्रिया व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. राज्यातील भाजप नेत्यांनी हे चुकीचे असल्याचे सांगितले.

नेमके काय म्हणाले अनिल बोंडे?
भाजपचे अमरावतीमधील नेते अनिल बोंडे यांनी शरद पवारांवर टीका करताना चिथावणी खोर वक्तव्य केले आहे. फ्रान्सच्या राजाला जनतेने भर चौकात शिक्षा दिली होती. त्याचीच थोडीफार पुनरावृत्ती महाराष्ट्रमध्ये होत आहे. पवारांचे शेवटचे वाईट दिवस सुरू झाले, असे वक्तव्य अनिल बोंडे यांनी केले आहे. यावेळी बोलताना बोंडे यांनी राज्यात जेव्हा शरद पवार यांची सुरक्षा नाही तर सर्वसामान्य जनतेचे काय? पवारांनी स्वत: जाहीर करावे की ते राज्यात सुरक्षित नाही आणि त्यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्याची शिफारस करावी. अशी मागणी भाजप नेते डॉ. अनिल बोंडे यांनी केली.