आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठवाडा दुर्लक्षित:"मुक्तिसंग्राम''च्या 75 कोटींचे आश्वासन‎ वाऱ्यावर, ध्वजवंदनाशिवाय काहीच नाही‎

मुंबई‎24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

"दोन सरकारे, मंत्र्यांच्या दोन समित्या, तरी वर्षांनंतर‎ मुक्तिसंग्रामानंतर दमडीही मिळेना,'' अर्थसंकल्पात ७५‎ कोटी रुपयांची घोषणा केल्यानंतर पैसे दिलेच नसल्याचे‎वृत्त ‘दिव्य मराठी’ने एक मार्च रोजी‎प्रकाशित केले होते. त्यानंतर गुरुवारी ‎माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण‎ यांनी, शासनाने ७५ कोटी रुपये‎देण्याची घोषणा केली. मात्र नवीन ‎सरकारच्या उपसमितीने ना कार्यक्रम‎ राबवले, ना मागील सरकारने घोषित केलेला निधी‎ दिला नाही. १७ सप्टेंबर रोजी हे वर्ष सुरू होऊन‎ साडेपाच महिने झाले. मात्र, आजवर ध्वजवंदनाशिवाय‎ एकही कार्यक्रम झाला नसल्याची टीका राज्यपालांच्या‎ अभिभाषणावरील चर्चेदरम्यान राज्य सरकारवर केली‎ आहे.‎ माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी राज्यपालांच्या‎ अभिभाषणातील विसंगतीकडे सभागृहाचे लक्ष वेधले. ते‎ म्हणाले की, अभिभाषणात, हैदराबाद मुक्तिसंग्रामाचे‎ अमृतमहोत्सवी वर्ष साजरे होत असल्याचे राज्य‎ सरकारने म्हटले आहे. मात्र, निधीची काहीच तरतूद‎ केली नाही.‎

याच वर्षी‎ घोषणा पूर्ण‎ करण्याची‎ मागणी‎ स्वातंत्र्याच्या ७५व्या वर्षानिमित्त महाविकास आघाडी सरकारच्या अर्थसंकल्पात तत्कालीन‎ अर्थमंत्री अजित पवार यांनी मराठवाडा खादी ग्रामोद्योग समितीच्या नूतनी करणासाठी २५ कोटी‎ दिले. मात्र, त्याला अजूनही उद्योग विभागाकडून प्रशासकीय मान्यता मिळालेली नाही.‎ अमृत महोत्सवी वर्षात झालेल्या घोषणा त्याच वर्षात पूर्ण व्हायला हव्यात, अशी मागणी माजी‎ मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केली.‎

हुतात्म्यांना अभिवादन‎ करणारा ठरावही मांडला नाही विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात‎ हुतात्म्यांना अभिवादन करणारा साधा‎ ठरावसुद्धा या राज्य सरकारला मांडता‎ आला नाही. याबाबत महाविकास‎ आघाडी सरकारच्या काळातील‎ उपसमितीने हैदराबाद मुक्तिसंग्रामाचे‎ ७५वे वर्ष साजरे करण्यासाठी‎ कार्यक्रमांची रूपरेषा आखली. ७५‎ कोटींच्या निधीची घोषणा केली. तो‎ निधीही या सरकारने दिला नाही, अशी‎ जोरदार टीका माजी मुख्यमंत्री अशोक‎ चव्हाण यांनी यावेळी राज्य सरकारवर‎ केली.‎

मुंबई-नागपूर बुलेट‎ ट्रेन नांदेडपर्यंत जोडावी‎ मविआ सरकारच्या काळात‎ जालना ते नांदेड समृद्धी‎ महामार्गाचा निर्णय घेतला.‎ नांदेडपासून पुढे हैदराबादपर्यंत‎ नवीन महामार्ग उभारण्यासाठी‎ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी‎ यांच्याशी आमची चर्चा झाली‎ होती. ते सकारात्मक आहेत.‎ यासंदर्भात राज्य सरकारने‎ केंद्राकडे पाठपुरावा करावा.‎ त्याचप्रमाणे समृद्धी‎ महामार्गालगत मुंबई-नागपूर‎ बुलेट ट्रेनला जालन्याहून‎ नांदेडपर्यंत जोडावे. त्यामुळे‎ मराठवाड्यातील प्रवाशांना काही‎ तासांत मुंबईला पोहोचणे शक्य‎ होईल, अशीही मागणी माजी‎ मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी‎ विधानसभेत केली.‎

बातम्या आणखी आहेत...