आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:40 आमदारांसाठी निधीची उधळण‎ , विरोधी पक्षनेते अजित पवार यांची अर्थसंकल्पावर टीका‎

मुंबई‎13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अर्थसंकल्पातून राज्यातील‎ कोणत्याच घटकाला फारसे काही ‎ ‎ मिळणार नाही. केवळ घोषणांचा ‎ ‎ अवकाळी पाऊस पाडण्याचे काम ‎ ‎ अर्थसंकल्पातून झाले.‎ अर्थसंकल्पात भाजपला‎ महाप्रसाद, शिंदे गटाला प्रसाद तर ‎ ‎ इतरांना थोडे -थोडे ‘पंचामृत’ ‎ ‎ मिळाले. यात सर्वसामान्य‎ जनतेच्या आशा-आकांक्षा वाहून ‎ ‎ गेल्या . या अर्थसंकल्पातून‎ सर्वसामान्य जनतेची घोर निराशा‎ झाली असून हा अर्थसंकल्प‎ म्हणजे बोलाचीच कढी आणि‎ बोलाचाच भात आहे, अशी‎ खरमरीत टीका विरोधी पक्षनेते‎ अजित पवार यांनी सोमवारी‎ विधानसभेत केली.‎ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस‎ यांनी अर्थसंकल्पीय भाषणात‎ संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या‎ अनेक ओव्यांचा दाखला दिला‎ होता. त्यामुळे पवार यांनीही "जिते‎ नाही अन्न । मेल्यावरी पिंड दान ।।‎ ही तो चाळवा चाळवी ।। केले‎ आपणचि जेवी ।" ही तुकाराम‎ महाराजांची ओवी ऐकवत‎ अर्थसंकल्पात राज्याच्या सध्याच्या‎ प्रश्नांवर कोणतीही ठोस‎ उपाययोजना नसल्याचे पवार यांनी‎ सांगितले. अर्थव्यवस्थेवर परिणाम‎ होत असून केवळ ४० आमदारांना‎ संभाळण्यासाठी निधीची उधळण‎ सुरु आहे. विधानसभेतील २८८‎ आमदारांपैकी केवळ ४०‎ आमदारांसाठी सरकार काम करत‎ आहे. यामुळे भाजप आमदारांची‎ धुसफूस सुरु आहे. मुख्यमंत्र्यांनी‎ त्यांच्या गटाच्या चाळीस‎ आमदारांच्या कामांना मंजुरी‎ देण्याचा सपाटा लावला आहे,‎ असा आरोप पवार यांनी लगावला.‎

एकनाथ शिंदे, फडणवीसांच्या जिल्ह्यातच खर्च‎ पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र‎ फडणवीस पालकमंत्री असलेल्या सहा जिल्ह्यात जिल्हा नियोजन‎ मंडळाचा निधी कमी प्रमाणात खर्च झाल्याचे आकडेवारसह सांगितले.‎ ठाणे जिल्ह्यात केवळ ४२. टक्के निधी खर्च झाला आहे. सर्व जिल्ह्यांच्या‎ तुलनेत ठाणे जिल्हा खर्चाच्या बाबतीत राज्यात बाराव्या स्थानावर आहे.‎ फडणवीस पालकमंत्री असणाऱ्या नागपूर जिल्ह्यात १५. ६१ टक्के, वर्धा‎ जिल्ह्याचा निधी १९. टक्के अमरावती जिल्ह्याचा १६.७७ टक्के व इतर‎ जिल्ह्यात खर्च झाल्याचे सांगितले.‎

बातम्या आणखी आहेत...