आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परीक्षा केंद्रावर मधमाशांचा हल्ला; तीन विद्यार्थी जखमी:चंद्रपूरच्या राजुरा तालुक्यातील पेलोरा येथील घटना

चंद्रपूर22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बारावीची परीक्षा सुरू असताना आज १ मार्च रोजी राजुरा तालुक्यातील संजय गांधी कनिष्ठ महाविद्यालय पेलोरा या केंद्र परीक्षा केंद्रावर प्रवेशद्वाराजवळ मधमाशांनी हल्ला चढवल्यामुळे तीन विद्यार्थी व शिक्षक जखमी झाले. ही घटना पेपर सुरू होण्यापूर्वी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास घडली. यामुळे परीक्षा केंद्रावर एकच गोंधळ उडाला. जखमी दोन विद्यार्थ्यांना उपचारासाठी कडोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हलवण्यात आल्याने त्यांना पेपर देता आला नाही.

उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचे पेपर सर्वत्र सुरू आहेत. त्या अनुषंगाने इयत्ता बारावीचा रसायनशास्त्र व व्होकेशनल विषयाचा पेपर होता. सकाळी ११ ते २ या कालावधीत पेपर सुरू असल्यामुळे विद्यार्थी परीक्षा केंद्रावर जाण्यासाठी प्रवेश करत असताना प्रवेशद्वारा जवळच मधमाशांनी हल्ला चढवला. त्यामुळे सर्वत्र गोंधळ उडाला. यात मधमाशांनी चावा घेतल्यामुळे ३ विद्यार्थ्यांना गंभीर दुखापत झाली. यात सूरज भिमनकर व तेजस मुके हे गंभीर जखमी झाल्यामुळे उपचारासाठी तात्काळ प्राथमिक आरोग्य केंद्रात हलवण्यात आले. तसेच शिक्षक मोरेश्वर लांडे व दीपक उमरे हा विद्यार्थीही मधमाशांच्या हल्ल्यात सापडले. लगेच परिस्थिती आटोक्यात आणण्यात आली. उपचारासाठी तात्काळ प्राथमिक आरोग्य केंद्र कडोली येथे फोन करून ॲम्बुलन्स बोलवण्यात आली. यानंतर पेपरला नियमित वेळात सुरुवात करण्यात आली.

पेलोरा येथील परीक्षा केंद्रावर एकूण ९६ विद्यार्थी परीक्षा देत होते. परीक्षा केंद्रावर अर्धा तास अगोदर विद्यार्थी परीक्षा केंद्रावर पेपर देण्यासाठी खोल्यांमध्ये जात असताना ही घटना घडली. त्यामुळे शिक्षक व विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे पहायला मिळाले आहे.

बातम्या आणखी आहेत...