आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
भंडारा अग्नीतांडवप्रकरणी हलगर्जीपणा झाला आहे. याप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा आणि सर्व रुग्णालयांचे फायर ऑडिट करावे अशी मागणी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी सकाळी भंडाऱ्यात पोहोचले होते. जिल्हा रुग्णालयात जाऊन त्यांनी पाहणी केली. त्यानंतर पत्रकारांशी बोलत असताना प्रतिक्रिया दिली.
ते म्हणाले की, भंडारामधील घटना अत्यंत वेदनादायी आणि धक्कादायक आहे. प्रगतीशील महाराष्ट्रात 10 नवजात बालकांचा मृत्यू ICU मध्ये व्हावा यासारखी लाजिरवाणी परिस्थिती दुसरी नाही. याची उच्चस्तरीय चौकशी व्हावी, दोषींवर कडक कारवाई करावी. महाराष्ट्राच्या इतिहासातील काळी घटना आहे. अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सरकारी दवाखान्यांचे ऑडिट व्हायला पाहिजे, फायर ऑडिट का झाले नाही याची चौकशी व्हावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
Bhandara incident is very tragic and painful.
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) January 9, 2021
We demand high level probe!
Reached Nagpur and about to reach Bhandara.https://t.co/53fm4dvmnz pic.twitter.com/bGNnS04kyE
आम्हाला यात कोणतेही राजकारण करायचे नाही. पण, सरकारकडून जे दावे केले जात आहे, ते अत्यंत चुकीचे आहे. हे यातून स्पष्ट दिसत आहे, असा आरोपही फडणवीस यांनी महाराष्ट्र सरकार केला. दरम्यान मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख ऐवजी 10 लाखाची मदत द्यावी, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.