आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाविकास आघाडीच्या काळात अतिशय सक्रिय असणारे राज्यपाल आता एकदम गप्प का आहेत, असा रोखठोक सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी येथे माध्यमांशी बोलताना केला आहे. महाराष्ट्रात दोन जणांचे अपंग सरकार काम करत आहे. आता राज्यपाल कुठे आहेत, असा सवाल जनता करत आहे. भाजप संवैधानिक पदाचा कसा दुरुपयोग करत आहे याचे हे उदाहरण आहे.
भाजप तानाशाही करत संवैधानिक व्यवस्थेच्या विरोधात काम करत आहे. गडचिरोलीतील संकट अस्मानी नसून सुलतानी आहे. यासाठी भाजप जबाबदार आहे, असेही पाटोले म्हणाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.