आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समाजकार्य विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची भेट‎:आदिवासी अजूनही विकासापासून‎ वंचित : डॉ. प्रसेनजित चिखलीकर‎

वाशीम‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील श्री रामराव सरनाईक‎ समाजकार्य महाविद्यालयातील अंतिम‎ वर्षाला शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी‎ ‘क्षेत्रभेटी’अंतर्गत मालेगाव‎ तालुक्यातील अमानी या आदिवासी‎ बहुल गावाला भेट दिली. क्षेत्रकार्य‎ समन्वयक तथा विषय शिक्षक प्रा. डॉ.‎ प्रसेनजित चिखलीकर व‎ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर‎ वाहाणे यांच्या मार्गदर्शनात आयोजित‎ या उपक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी‎ गावातील आदिवासी बांधवांच्या‎ समस्या, तसेच शासनाच्या विविध‎ विकास योजनांबाबत माहिती जाणून‎ घेतली. यावेळी विद्यार्थ्यांनी गावफेरी‎ काढत गावात बिबे फोडून त्यातून‎ गोडंबी काढणाऱ्या आदिवासी‎ महिलांच्या जाणून घेतल्या.

यावेळी‎ डॉ. चिखलीकर यांनी विद्यार्थ्यांना‎ मार्गदर्शन करताना आदिवासी‎ अजूनही विकासापासून दूर असल्याचे‎ सांगितले.‎ प्रास्ताविक मीनाक्षी सानप या‎ विद्यार्थिनीने केले. गावातील सरपंच‎ अनिल जाधव यांनी गावाची व‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ आदिवासी समुदायाची संपूर्ण माहिती‎ विद्यार्थ्यांना दिली. यावेळी प्रा.डॉ.‎ प्रसेनजित चिखलीकर यांनी‎ आदिवासी समुदायाची सामाजिक,‎ आर्थिक, राजकीय, शैक्षणिक,‎ सांस्कृतिक आणि आरोग्यविषयक‎ समस्या तसेच त्यांची व्यसनाधीनता,‎ अंधश्रद्धा, उद्योग- व्यवसाय,‎ बोलीभाषा याविषयी विद्यार्थ्यांना‎ सखोल व मोलाचे असे मार्गदर्शन‎ केले.‎

यावेळी गावातील आदिवासी‎ भागातील सोयी सुविधा, लघुउद्योग,‎ महिला बचत गट यात प्रामुख्याने‎ आदिवासी महिलांचा बिब्याची गोडंबी‎ फोडण्याचा गृह उद्योगाला विद्यार्थ्यांनी‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ भेट दिली व याची संपूर्ण माहिती‎ मिळवली. तसेच त्या महिला कोणतेही‎ सुरक्षेचे आधुनिक साधने वापरत‎ नसल्यामुळे या उद्योगाचा त्यांच्या‎ आरोग्यावर कसा विपरीत परिणाम‎ होतो हे जाणून घेतले. तसेच विविध‎ सामाजिक संस्थांच्या माध्यमातून,‎ सामाजिक कार्यकर्त्यांच्या साहाय्याने‎ व ग्रामपंचायत मार्फत विविध प्रकल्प‎ व शबरी योजना राबवण्यात आलेल्या‎ आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन‎ प्रदीप पट्टेबहादूर या विद्यार्थाने, तर‎ आभार प्रदर्शन पायल सरकटे या‎ विद्यार्थिनी केले. यावेळी‎ एम.एस.डब्ल्यू. अंतिम वर्षाचे सर्व‎ विद्यार्थी उपस्थित होते.‎