आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहा मुलगा माझा नाही म्हणत चार वर्षीय चिमुकल्याला पोत्यात बांधून गोदावरी पात्रात फेकून हत्या केल्याची धक्कादायक घटना नांदेड जिल्ह्यातील नारनाळी येथे २८ मार्च रोजी घडली. अभिषेक माधव देव्हारे असे मृत झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे.
आरोपी माधव देव्हारे याला दोन मुले आहेत. माधवने आपल्या पत्नीवर संशय घेत लहान मुलगा अभिषेक हा माझा नाही, असा वाद तो आपल्या पत्नी सोबत घालत होता. सोमवारी अभिषेक हा गावात खेळत असताना आरोपी माधवने त्याला गावाला जायाचे असे सांगत रिक्षात बसवून नायगाव तालुक्यातील राजेर येथील गोदावरी पात्राकडे नेले. माधवने चिमुकल्या अभिषेकला पोत्यात बांधून नदीत फेकले. घरी अभिषेक आढळून न आल्याने नातेवाईकानी कंधार पोलीस ठाण्यात 29 मार्च रोजी अपहरणाचा गुन्हा दाखल केला.
मुलाचा मृतदेह आढळला धर्माबाद तालुक्यात -
याप्रकरणी कंधार पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक पडवळ पोलिस उपनिरीक्षक इंद्राळे यांनी तपासाची चक्रे फिरवली असता पोलिसांना माधववर संशय आला.पोलिसी खाक्या दाखविताच माधवने गुन्ह्याची कबुली दिली. त्याने ज्याठिकाणी मुलाचा मृतदेह फेकला त्याचा शोध घेतला असता, तो धर्माबाद तालुक्यातील येल्लापूरच्या शिवारात पोत्यात आढळून आला. पोलिसांनी अभिषेकचा मृतदेह ताब्यात घेऊन मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी पाठविण्यात आला. या प्रकरणी आरोपी माधव देव्हारेच्या विरुद्ध कंधार पोलिस ठाण्यात हत्या केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस निरीक्षक पडवळ हे करत आहेत.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.