आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून मुखेड तालुक्यातील पाळा भी. येथील शेतकरी देविदास लक्ष्मण उमाटे (४०) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना १ मे रोजी पहाटे पाच वाजेच्या सुमारास उघडकीस आली. पाळा भी. येथील शेतकरी देविदास यांच्यावर महाराष्ट्र बँकेचे कर्ज होते. तसेच शेतीतूनही उत्पन्न निघत नव्हते. सततच्या या नापिकीने बँकेचे कर्ज कसे फेडावे या चिंतेत ते राहत होते. तणावात येऊन त्यांनी एक मे रोजी पहाटे पाच वाजेच्या सुमारास शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी मुखेड पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मृत शेतकऱ्याच्या पश्चात पत्नी, तीन मुले असा परिवार आहे.
कर्ज फेडण्याची होती चिंता
सततच्या नापिकी व अवेळी झालेल्या अवकाळी पावसामुळे सलग तीन-चार वर्षांपासून शेतीपिकांचे नुकसान झाले. त्यात उत्पन्नाचे शेतीशिवाय दुसरे साधन नसल्याने काकासाहेब निवृत्ती तवार यांच्यावर असलेले कर्ज फिटत नव्हते, उलट कर्जाचा डोंगर वाढतच होता. या विवंचनेत ते अनेक दिवसांपासून वावरत हाेते. -प्रतिभा संभाजी तवार, सरपंच, कडेठाण.
शेतकऱ्यावर उसनवारीचे 3 लाख व बँकांचे २ लाख कर्ज
प्रतिनिधी | आडूळ मुलीच्या लग्नासाठी घेतलेले कर्ज जमीन विकूनही फिटत नसल्यामुळे हताश झालेल्या शेतकऱ्याने विष प्राशन करून अात्महत्या केली. ही घटना पैठण तालुक्यातील कडेठाण येथे बुधवारी (३ मे) सकाळी उघडकीस आली. काकासाहेब निवृत्ती तवार (६१, रा. कडेठाण, ता. पैठण) असे अात्महत्या शेतकऱ्याचे नाव अाहे. काकासाहेब यांची कडेठाण शिवारात ३ एकर शेती अाहे. त्यात ते हंगामी पिके घेतात. मात्र, उत्पन्न कमी व खर्च जास्त होत असल्याने तिन्ही मुलीच्या लग्नासाठी घेतलेले कर्ज फेडावे कसे या विवंचनेत ते होते. कर्ज फेडण्यासाठी शेवटी त्यांनी काही जमीन विक्रीदेखील केली होती. पण कर्ज फिटले नाही. दरम्यान, काकासाहेब यांच्यावर उसनवारीचे तीन लाख व एसबीआय बँकेचे दोन लाख असे ५ लाखांचे कर्ज होते, असे त्यांचे चिरंजीव विश्वास तवार यांनी सांगितले.
काकासाहेब तवार हे मंगळवारी (२ मे) सकाळी आडूळ येथील आठवडी बाजाराला जात असल्याचे सांगून घरातून बाहेर पडले हाेते. त्यांनी आडूळला जाऊन पिकाच्या फवारणीसाठी म्हणून औषधी खरेदी केले. यानंतर कडेठाण शिवारातील शेतीकडे गेले अाणि त्यांच्या शेताशेजारील शेतात विष प्राशन केले. पाचोड पोलिसांनी घटनास्थळी येऊन ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी हलवले. दुपारी कडेठाण येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात अाले. काकासाहेब यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, तीन विवाहित मुली, जावई असा परिवार असल्याची माहिती देण्यात आली.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.