आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष‎:बाष्पीभवन टाळण्यासाठी कडवा कालव्याला 250 दलघफू आवर्तन‎

भरत घोटेकर | सिन्नर‎22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कडवा धरणातून सोडण्यात येणाऱ्या रब्बी आवर्तनातून शिल्लक‎ राहिलेल्या २५० दलघफू आवर्तन कालव्याला नुकतेच सोडण्यात‎ आले आहे. शेतीसाठी प्रत्यक्षात हे पाणी दिले जाणार नाही. मात्र‎ केवळ कालवा रिचार्ज होऊन कालव्याकडेच्या ७०० हून अधिक‎ विहिरींची पाणी पातळी उंचावण्यास या आवर्तनामुळे लाभ होणार‎ आहे.‎ कडवा धरणातून रब्बीसाठी जानेवारी महिन्यात १०२० दलघफू‎ आवर्तन सोडण्याचे नियोजित होते. कालव्याच्या लाभक्षेत्रात‎ येणाऱ्या सिन्नर व निफाड या दोन्ही तालुक्यात पर्जन्यमान मुबलक‎ असल्याने यंदा पाणी मागणी कमी प्रमाणात नोंदवली गेली. परिणामी‎ कालव्याचे आवर्तन मुदतीपूर्वीच बंद करण्यात आले. १०२० पैकी‎ ७७० दशलक्ष घनफूट पाणी आवर्तनासाठी वापरले गेले.

त्यातून‎ ३५०० हेक्टर क्षेत्र भिजले. तर उर्वरित २५० दलघफू पाणी धरणात‎ शिल्लक राहिले. मात्र सध्या पाण्याची काही प्रमाणात निकड भासू‎ लागल्याने शेतकऱ्यांनी आमदार माणिकराव कोकाटे यांच्याकडे‎ कडवाचे उर्वरित पाण्याचे आवर्तन मे महिन्यात सोडण्याऐवजी‎ लगेच सोडल्यास पाण्याचे परकोलेशन होऊन विहिरींना लाभ‎ होईल, अशी मागणी केली होती. त्यावर आमदार कोकाटे यांनी‎ कडवाचे कार्यकारी अभियंता मिलिंद बागुल यांच्याशी चर्चा करून‎ रब्बीतून उरलेल्या २५० दलघफू आवर्तन सोडावे अशा सूचना‎ दिल्या.

पाणी वाया जाण्याऐवजी शेतीला‎ ठरणार उपयोगी‎
मार्च, एप्रिल, मे हे तीन महिने कडक उन्हाळ्याचे‎ असल्याने मोठ्या प्रमाणावर बाष्पीभवन होईल. रब्बी‎ आवर्तनातून धरणात शिल्लक राहिलेले‎ शेतकऱ्यांच्या हक्काचे २५० दलघफू पाणी वाया‎ जाईल. त्यापेक्षा ते कालव्याला सोडल्यास कालवा‎ रिचार्ज होण्याबरोबरच कालव्याकडेच्या विहिरींच्या‎ पाणी पातळीत वाढ होईल, ही बाब आमदार कोकाटे‎ यांनी कडवाच्या अधिकाऱ्यांना पटवून दिल्यानंतर‎ त्यांनीही आवर्तन सोडण्यास होकार दिला.‎

450 दलघफू पाणी योजनासाठीही आरक्षित
शनिवारी कडवा कालव्याला आवर्तन सोडण्यात‎ आले आहे. पाचव्या दिवशी पाणी बुधवारी‎ (दि.१) वडांगळीच्या पुढे झेपावले होते. शेवटच्या‎ ८८ किलोमीटरला पुतळेवाडी पर्यंत एक-दोन‎ दिवसात पाणी पोहोचण्याची अपेक्षा आहे. २५०‎ दशलक्ष घनफूट पाणी संपताच हे आवर्तन बंद‎ करण्यात येणार आहे. ४५० दलघफू पाणी इगतपुरी‎ तालुक्यातील पाणीपुरवठा योजना आणि सिन्नर‎ नगरपालिकेच्या पाणी योजनेसाठी आरक्षित‎ ठेवण्यात येणार असल्याचे कडवाच्या‎ अधिकाऱ्यांनी सांगितले. याशिवाय धरणापासून‎ किमान ४-५ किलोमीटर कडवा नदीकाठच्या‎ पाणीपुरवठा योजनांना बळकटी देण्यासाठी‎ उन्हाळ्यात आवर्तन सोडले जाते.‎

बातम्या आणखी आहेत...