आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मजुरांना मिळेना घामाचे दाम:पावणे दोन महिन्यापासून ‘राेहयाे ’च्या‎ 21,708 मजुरांचे अडकले 3.45 काेटी‎

भरत घोटेकर | सिन्नर‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शासन स्तरावर बँक पातळीवर‎ येणाऱ्या अडचणी दूर करण्यात दिरंगाई ‎होत असल्याने जिल्ह्यातील २१ हजार ‎७०८ मजुरांची ३ कोटी ४५ लाख ७९ ‎हजार ६०२ रुपये इतकी मजुरीची‎ रक्कम पावणे २ महिन्यांपासून‎ रखडली आहे. त्यामुळे हातावर पोट ‎असलेल्या मजुरांचे हाल सुरू आहे.‎ लाल फितीचा फटका रोजंदारीवर‎ काम करणाऱ्या नरेगाच्या मजुरांना‎ बसला आहे.‎

रोहयोमधील अधिकारी, कर्मचारी ‎आणि रोजगार सेवकांचा संप यामुळे ‎जिल्ह्यातील रोहयोच्या कामांची संख्या ‎मंदावली आहे. त्यातच १२ डिसेंबर‎ २०२२ पासून रोजगार हमीवर काम ‎करणाऱ्या मजुरांना त्यांच्या मजुरी पोटी ‎देण्यात येणारे वेतनच बँक खात्यात‎ वर्ग न झाल्याने त्यांची आबाळ सुरू‎ आहे. खासगी ठिकाणी मजुरी‎ करणाऱ्या मजुरांना ३०० ते ४०० रुपये‎ मोबदला दिला जातो.

रोजगार हमीतून‎ मिळणारी २५६ रुपये मजुरी अल्प‎ असल्याने या कामांवर मजूरही मिळत‎ नाही. त्यांना ८ दिवसांत मजुरीची‎ रक्कम वर्ग करणे अपेक्षित असताना‎ बँक स्तरावर असलेल्या अडचणीमुळे‎ नरेगासाठी अनुदान असूनही पावणे‎ दोन महिने उलटूनही घामाचे दाम‎ मिळत नसल्याने मजुरांत नाराजी‎ आहे. कळवण तालुक्यात सर्वाधिक‎ २६९८ मजुरांचे ४२ लाख ६४ हजार‎ २१४ रुपयांचे तर सर्वात कमी देवळा‎ तालुक्यात २४१ मजुरांचे ३ लाख ८१‎ हजार ९३६ रुपयांचे वेतन थकीत आहे.‎

संपूर्ण राज्यभरातच समस्या‎
बँक पातळीवर सुरू असलेल्या‎ अडचणींमुळे संपूर्ण राज्यभरातच‎ मजुरांना वेतन मिळालेले नाही.‎ यासंदर्भात नागपूर नरेगा आयुक्त‎ कार्यालयास पत्रव्यवहार करण्यात‎ आला आहे. १५ दिवसांपूर्वी पुन्हा‎ स्मरणपत्र पाठवण्यात आले आहे.‎ -सनी धात्रक, जिल्हा माहिती‎ व्यवस्था समन्वयक, नरेगा‎

काम करूनही मजुरी मिळेना‎
गावात रोहयोतून सुरू असलेल्या‎ रस्त्यावर जानेवारी महिन्यात १५ दिवस‎ काम केले, मात्र त्याची अद्यापही‎ मजुरी मिळालेली नाही. त्यामुळे‎ अडचणींचा सामना करावा लागत‎ आहे. राज्य शासनाने लवकरात‎ लवकर केलेल्या कामाच्या मजुरीची‎ रक्कम द्यावी.‎ -वसंत डांगे, मजूर, किर्तांगळी‎

२५१ कामांवर ८ हजार मजुरांची उपस्थिती‎
नरेगात कार्यरत असलेल्या तांत्रिक अधिकारी, सहायक कार्यक्रमाधिकारी, डाटा‎ एन्ट्री ऑपरेटर यांचा विविध प्रलंबित मागण्यांसाठी १८ जानेवारीपासून संप सुरू‎ होता. त्यामुळे जिल्ह्यात रोहयोच्या कामांची संख्याही मंदावली होती. केवळ‎ घरकुल, गाय गोठा आणि इतर वैयक्तिक स्वरूपाची १८६ कामे ग्रामपंचायत‎ स्तरावर तर यंत्रणेची ६५ अशी २५१ कामे रोहयोमार्फत सुरू आहेत. या कामांवर‎ सध्या ८ हजार मजूर कार्यरत आहेत.‎

बातम्या आणखी आहेत...