आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:4 यात्रोत्सव, 27 जादा बसेस अन् 150 फेऱ्या‎

सिन्नर‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील वडांगळीसह विविध यात्रोत्सवासाठी सिन्नर बस‎ आगाराने जादा फेऱ्यांचे नियोजन केले आहे. भाविकांसाठी २७‎ जादा बसेस सोडण्यात येणार असून १५० फेऱ्यांद्वारे सिन्नरहून‎ यात्रास्थळापर्यंत पोहोच करण्याची व्यवस्था करण्यात आली‎ आहे.‎ स्थानकप्रमुख सुरेश दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली आगाराने‎ नियोजन केले आहे. शनिवारपासून त्याची अंमलबजावणी‎ सुरू झाली आहे. कोरोना नंतर प्रथमच भरणाऱ्या यात्रेसाठी‎ मोठ्या संख्येने भाविक येण्याची शक्यता आहे.

त्यामुळे‎ भाविकांची पुरेसी संख्या होताच आगारातून बस यात्रा‎ स्थळाकडे रवाना करण्यात येणार आहे.‎ वडांगळीसाठी सात बस : राज्यासह देशातील विविध ‎ ‎ भागातून वडांगळी यात्रेसाठी बंजारा भाविक येतात. सिन्नर ते ‎ ‎ वडांगळी मार्गावर भाविकांसाठी सात जादा बस सोडण्यात‎ येणार आहेत. या बसेसद्वारे २४ तास प्रवास सेवा उपलब्ध‎ करून देण्यात आली आहे. सतीमाता-सामतदादा हा तीन‎ दिवस यात्रोत्सव असून शंभरहून अधिक फेऱ्या होतील.‎

जाळीच्या देवासाठी १५ बसेस रवाना‎
जाळीचा देव यात्रोत्सवासाठी सिन्नर आगारातून १५ बस शनिवारी रवाना करण्यात‎ आल्या. ६७५ भाविक यात्रेसाठी गेले आहेत. सुमारे ३५० किलोमीटरचा प्रवास आहे.‎ यात्रेकरूंचे बारागावपिंप्री येथे स्वागत करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रेय‎ गोसावी यांनी राजगिरा लाडूचे वाटप केले. चालक वाहकांचा गौरव करून बस रवाना‎ करण्यात आल्या. यावेळी माजी सरपंच शशिकांत उगले, राजेंद्र गोराडे, सोपान पानसरे,‎ नामदेव गोराडे आदी उपस्थित होते.‎

जेजुरीकरिता‎ तीन जादा बसेस‎
आगारामार्फत जेजुरीला जाण्यासाठी‎ विशेष बससेवा देण्यात आली आहे.‎ रविवारी तीन बसमधून थेट‎ जेजुरीकरिता प्रवास सेवा देण्यात‎ येणार आहे. दोडी येथील म्हाळोबा‎ यात्रेकरिता नाशिक-पुणे‎ महामार्गावरून जाणाऱ्या बसद्वारे‎ भाविकांची सोय करण्यात येणार आहे.‎ विविध आगाराच्या बस संगमनेर,‎ नारायणगाव, पुणे, नाशिकदरम्यान‎ धावतात. याच बसमधून भाविकांना‎ दोडी येथे जाता येणार आहे. मऱ्हळ‎ येथील खंडोबा महाराज यात्रेसाठी दोन‎ जादा बस सोडण्यात येणार आहेत. या‎ बसच्या यात्राकाळात दिवसभर फेऱ्या‎ सुरू राहतील.‎

बातम्या आणखी आहेत...