आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवड:स्वयंचलित पोल्ट्री फार्म प्रकल्पास 50 हजारांचे बक्षीस‎

चांदवड9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद येथील ‘मराठवाडा‎ असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल‎ इंडस्ट्रीज अँड अॅ ग्रीकल्चर‎ (मसिया)’ आणि ‘टाटा‎ टेक्नॉलॉजीज्’ यांनी आयोजित‎ केलेल्या ‘इनोव्हेटिव्ह आयडिया‎ अॅक्सिलरेटर प्रोग्राम’ स्पर्धेत येथील‎ स्व. कांताबाई भवरलालजी जैन‎ अभियांत्रिकी महाविद्यालयातील‎ विद्यार्थिनींनी बनविलेल्या ‘स्वयंचलित‎ पोल्ट्री फार्म’ प्रकल्पाची निवड होऊन‎ महाविद्यालयाला २० हजार रुपये निधी‎ पहिल्या राउंडसाठी प्राप्त झाला असून‎ पुढील राउंडसाठी ३० हजार रुपये‎ वितरीत करण्यात येणार आहे.‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ महाविद्यालयातील अंतिम वर्षातील‎ संगणक शाखेतील विद्यार्थिनी महिमा‎ कासलीवाल, ऋतुजा देशमाने, लिशा‎ जैन व तेजस्विनी मुथा यांनी प्रा. डी.‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ एस. राजनोर व प्रा. पी. एम. बोरा यांच्या‎ मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प सादर‎ केला. हा प्रकल्प महाविद्यालयाच्या‎ वर्कशॉपमध्येच तयार करण्यात आला.‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ पहिल्या फेरीत नावीन्यता,‎ किफायतशीरपणा, विशिष्टता,‎ व्यवहार्यता आणि बाजारातील मागणी‎ या आधारावर संघ कल्पना निवडण्यात‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ आली.

तर दुसऱ्या राउंडसाठी सहभागी‎ संघाने ज्युरीला त्यांचा कृती आराखडा,‎ व्यवसाय मॉडेल कॅनव्हास, प्रोटोटाइप‎ इत्यादी सादर केला.‎ प्रकल्पासाठी प्रकल्प गाइड प्रा. डी. एस.‎ राजनोर, इ.डी.सी प्रमुख प्रा. पी. एम.‎ बोरा, संगणक विभागप्रमुख डॉ. के.‎ एम. संघवी, उपप्राचार्य डॉ. एम. आर.‎ संघवी, प्राचार्य डॉ. एम. डी. कोकाटे‎ यांनी विशेष मार्गदर्शन केले.‎ यशस्वी विद्यार्थिनींचे संस्थेच्या‎ विश्वस्त समितीचे अध्यक्ष बेबीलाल‎ संचेती, उपाध्यक्ष दिनेशकुमार लोढा,‎ सेक्रेटरी जवाहरलाल आबड, प्रबंध‎ समितीचे अध्यक्ष अजितकुमार सुराणा,‎ उपाध्यक्ष अरविंदकुमार भन्साळी,‎ सहमानद सचिव झुंबरलाल भंडारी,‎ सुनीलकुमार चोपडा, प्राचार्य डॉ. एम.‎ डी. कोकाटे, उपप्राचार्य डॉ. एम. आर.‎ संघवी, विश्वस्त व प्रबंध समितीचे‎ पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले.‎

पोल्ट्री फार्मच्या उद्योगाला मिळणार बळकटी‎
या प्रकल्पामुळे तापमानाला अनुसरून पंखा, लाइट, पडदे हे स्वयंचलित चालू‎ किंवा बंद होणे, पोल्ट्री खाद्याचे योग्य प्रमाणात वाटप होणे, मोबाइल अ‍ॅपद्वारे‎ रनटाइम फार्मचे तापमान, आर्द्रता, गॅस लेव्हल यांचे रीडिंग मिळणे, प्रति दिवसाचे‎ रेकॉर्ड जतन करणे, विविध लसीकरणाच्या नोटिफिकेशन, खाद्य मोजणी हे‎ मोबाइल अ‍ॅपद्वारे उपलब्ध करून देणे, तसेच कूलिंग पॅड‌्सएेवजी वॉटर फॉगरचा‎ वापर केल्याने शेतकऱ्यांना कमीतकमी खर्चात जास्तीत जास्त फायदा होणार‎ आहे. विशेष म्हणचे फार्ममधील योग्य अनुकूल तापमानामुळे पक्षांचे मृत्युदराचे‎ प्रमाण अत्यल्प होऊन या प्रकल्पामुळे पोल्ट्री फार्मच्या उद्योगाला बळकटी प्राप्त‎ होईल आणि शेतकऱ्याचा व प्रामुख्याने देशाच्या आर्थिक विकासात मदत होणार‎ आहे.‎

बातम्या आणखी आहेत...