आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आश्वासन:तहसीलदारांच्या मध्यस्थीनंतर‎ शेतकऱ्यांचे उपोषण मागे

येवला‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नांदेसर व बदापूर या गावांच्या शेतातील‎ विहिरीमध्ये केमिकल युक्त द्रव्यांचा पाझर‎ होऊन शेतीचे नुकसान होत असल्याने‎ दोन्ही गावातील शेतकऱ्यांनी कृष्णा‎ एन्झोटेक कंपनीच्या प्रवेशद्वाराबाहेर बाहेर‎ बेमुदत उपाेषण सुरू केले हाेते. मात्र,‎ तहसीलदार प्रमाेद हिले यांनी‎ आंदाेलनकर्त्यांची भेट घेऊन परिसरातील‎ शेतकऱ्यांच्या वैद्यकीय तपासणी‎ करण्यासह प्रदूषण नियंत्रण मंडळ,‎ शेतकरी प्रतिनिधी आणि कंपनीच्या प्रमुख‎ संचालक मीनल वर्मा यांच्यासाेबत बैठक‎ घेऊन योग्य तोडगा काढण्यात येईल, असे‎ आश्वासन दिल्याने शेतकऱ्यांनी सुरू‎ केलेले उपाेषण तिसऱ्या दिवशी मागे घेतले‎ आहे.

याप्रसंगी सहायक पाेलिस निरीक्षक‎ नितीन खडांगळे, पोलिस हवालदार‎ चंद्रकांत निर्मळ उपस्थित होते‎ नांदेसर व बदापूर शिवारातील‎ शेतकऱ्यांच्या विहिरीचे पाणी कंपनीच्या‎ केमिकल द्रव्यामुळे पिण्यायोग्य राहिले‎ नसल्याचा गंभीर आरोप करत दोन्ही‎ गावच्या शेतकऱ्यांनी सदर कंपनी‎ कायमस्वरूपी बंद करण्याचा मागणीसाठी‎ वारंवार प्रशासनाकडे पाठपुरावा केला‎ हाेता. मात्र, त्यास प्रशासनाकडून केराची‎ टोपली दाखवली जात असल्याने‎ भाऊसाहेब शिंदे, मगन शिंदे, संकेत‎ शिंदे, मनोज शिंदे, ज्ञानेश्वर ढोमसे,‎ धनंजय शिंदे, प्रकाश देवडे, शरद‎ गायकवाड, श्रावण बेंडके आदींसह १५ ते‎ २० शेतकरी उपोषणाला बसले होते.‎

कंपनीत घातक केमिकल्स वापरली जात‎ आहेत. गाव व परिसरातील शेती तसेच‎ ग्रामस्थांची कुठलीही काळजी घेतली‎ जात नसल्याने त्वचारोग, खोकला आणि‎ इतरही आजार पसरत असल्याने‎ ग्रामस्थांना त्रास होत असल्याचे निवेदनात‎ म्हटले आहे. अनेकदा विनंती करूनही‎ आमच्या मागणीकडे दुर्लक्ष केले जात‎ असल्याचा आराेप आंदाेलकांनी केला‎ आहे. निवेदनावर आंदाेलकांच्या सह्या‎ आहेत. निवेदनासोबत ग्रामपंचायतीने‎ दिलेले दाखले, प्रदूषित जमिनीमधील‎ जळालेली पिकांचे फोटो, ग्रामस्थ आजारी‎ पडल्याचा प्राथमिक आरोग्य केंद्राचा‎ अहवाल, इतर कागदपतत्रही पुरावे म्हणून‎ जोडलेली आहेत.‎

बातम्या आणखी आहेत...