आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशेतकरीवर्गाने आता बोलले पाहिजे, बोलले नाही तर खूप वाईट परिस्थिती येईल. महाराष्ट्रात जेवढा कांदा पिकतो, त्याचा अर्ध्याहून अधिक कांद्याचे उत्पादन नाशिक जिल्ह्यात हाेते. मात्र, केंद्र सरकारने निर्यात बंदी केल्यामुळे मोठी समस्या निर्माण झाली असून दुसऱ्या देशात कांदा जाऊ नये यासाठी केंद्र सरकार दुटप्पी भूमिका घेत असल्याची टीका आमदार दिलीप बनकर यांनी केली.
पिंपळगाव बाजार समितीच्या आवारात कांदा उत्पादक शेतकऱ्यांशी त्यांनी चर्चा केली. आमदार बनकर म्हणाले, कांदा उत्पादक शेतकऱ्यांना चांगला भाव मिळावा यासाठी केंद्र सरकारकडे मागणी केली आहे. नाफेडने कांदा खरेदी करावा मात्र त्यासाठी व्यापाऱ्यांपेक्षा अधिक भाव दिला पाहिजे. तसेच बाजार समितीत येऊन कांदा खरेदी करावा, त्यामुळे स्पर्धा वाढेल. नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या व्यथा विधिमंडळात मांडल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. राज्य शासनाच्या अनुदानातून ५०० रुपये क्विंटल भाव द्यावा. शेतकऱ्यांनी एकत्र येऊन सरकारला प्रश्न केला पाहिजे. केंद्राला अनुदान देण्यासाठी भाग पडणार असल्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. कांद्याला बाहेरच्या देशात मोठी मागणी होती मात्र केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कांद्याला मोठे नुकसान झाले असल्याचे त्यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.