आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराइगतपुरी तालुक्यात मध्यरात्री सोसाट्याचा वारा अन् मेघगर्जनेसह गारांचा अवकाळी पाऊस बरसल्याने रब्बी हंगामातील गहू, हरभऱ्यासह उन्हाळ कांद्याचे माेठे नुकसान झाले.अगाेदरच संकटात असलेल्या शेतकऱ्यांना अवकाळीचा तडाखा बसल्याने ते हवालदिल झाले आहेत. दोन तास झालेल्या मुसळधारेने इगतपुरीच्या पूर्व भागातील अस्वली स्टेशन, बेलगाव कुऱ्हे, नांदुरवैद्य, कुऱ्हेगाव, गोंदे दुमाला, मोडाळे, शिरसाठे, कुशेगाव परिसराला झाेडपून काढले.
घोटी परिसरातील गावांतही पावसामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. काढणीसाठी आलेल्या गहू, हरभरा, कांदा पिकांसह चाऱ्याचे नुकसान झाले. जनावरांसाठी साठवलेले तणस भिजल्याने वाया गेले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.