आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यातील पूर्व भागात चिंचबारी, कापराई परिसरात गारपीट तर दहिवड येथे वादळासह झालेल्या बेमोसमी पावसाने जिल्हा परिषद शाळेचे पत्रे उडाले असून सुदैवाने अनर्थ टळला आहे. तालुक्यातील अनेक गावांमध्ये वादळासह पावसाचा धडाका मागील ते चार दिवसांपासून सुरू असून बुधवारी (दि. ८) दुपारच्या सुमारास कापराई, चिंचबारी परिसरात पाच ते दहा मिनिटे गारपीट झाली असून येथील शेतकरी हवालदिल झाला असून काढणीला आलेला गहू भुईसपाट झाला आहे. तसेच कांदा, उन्हाळी डोंगळे आदी पिकांचे गारपिटीने नुकसान झाले असून शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.
तालुक्यातील पूर्व भागात दहिवड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या तीन वर्गखाेल्यांचे व मधल्या भागातील मोकळ्या जागेतील निम्मे पत्रे वादळाने दुसऱ्या बाजूच्या पत्र्यावर उलटे पडले असून सध्या मार्च महिना असल्याने सकाळची शाळा सुरू असल्याने दुपारी विद्यार्थी शाळेत नव्हते त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. सदर घटनेची माहिती स्थानिकांनी शाळेच्या शिक्षकांना कळवली. शिक्षकांनी घटनास्थळी हजर होत वर्गखोल्या उघडून पाहणी केली असता काही वर्ग व कार्यालयातील कागदपत्रे व काही साहित्य ओले झाल्याचे निदर्शनास आले. तसेच काही शैक्षणिक साहित्यदेखील खराब झाले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.