आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासायखेडा, चांदोरीसह संपूर्ण गोदाकाठ भागात सोमवारी पहाटे दोनपासून सलग पाच तास वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाल्याने गहू, कांद्यासह भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. चांदोरी येथे वीज पडून गाय मृत्युमुखी पडली. अगोदर संथ पडणाऱ्या पावसाने वेग पकडत जोरदार सुरुवात केली. वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट सुरू होता.
रात्री झालेल्या पावसामुळे चांदोरी शिवारात वीज पडल्याने गणेश अाहेर यांच्या गाईचा मृत्यू झाला. सायखेडा परिसरात काढणीला आलेला गहू आडवा पडला. यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले. काढणीस आलेल्या कांद्याची नुकसान झाले आहे. शेतीमालाला भाव नसतानाच अवकाळी पावसाने दणका दिल्याने शेतकरी हताश झाला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.