आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासमाजाच्या विकासाच्या प्रक्रियेत सावित्रीच्या लेकी आपल्यापरीने वेगवेगळ्या क्षेत्रात आपले कार्य, कर्तृत्व सिद्ध करीत आहेत. अशाच गिर्यारोहक साहसी महिला सातत्याने विविध प्रकारचे अवघड शिखरे, गडकोट, दऱ्याखोऱ्या सर करणाऱ्या मुंबईच्या शिवशौर्य ट्रेकर्सच्या महिला भगिनींनी जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला राज्यातील सर्वोच्च शिखर सर केले.
त्यांच्या साहसी कार्याची दखल घेत कै. मुरलीधर गोटू कोतकर सेवाभावी संस्था, नाशिक आणि इगतपुरी तालुक्यातील कळसुबाई मित्र मंडळ यांच्या संयुक्त सहकार्याने शिवशौर्य ट्रेकर्सच्या साहसी गिर्यारोहक महिला भगिनींना सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ देऊन गौरविण्यात आले. यावेळी कै. मुरलीधर गोटूजी कोतकर सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीकांत कोतकर, कळसुबाई मित्र मंडळाचे अध्यक्ष भगीरथ मराडे, शाहीर बाळासाहेब भगत, तुकाराम धांडे, राम खुर्दळ, भूपाल देशमुख, वैजयंती सिन्नरकर, नम्रता सावंत, आदिती काटकर, शुभदा वर्तक, अंजना प्रधान, भटू कोतकर, देवांग जानी, अभिजित कुलकर्णी, सागर बोडके, बाळासाहेब आरोटे, गजानन चव्हाण, अशोक हेमके, काळू भोर, गोकुळ चव्हाण, सुरेश चव्हाण, रमेश हेमके, सोमनाथ भगत, उमेश दिवाकर, प्रविण भटाटे, नितीन भागवत, नीलेश पवार आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.