आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातापमानात वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे कांदा पातीवर रसशोषक किडीचा (थ्रीप्स) प्रादुर्भाव दिसून येत आहे. परिणाम स्वरूप उत्पादनात १५ ते २० टक्के नुकसान होण्याची शक्यता चितेगाव येथील राष्ट्रीय बागवानी अनुसंधान केंद्रातील तांत्रिक अधिकारी डॉ. मनोज कुमार पांडे, डॉ. नितीश शर्मा, श्रीवर्षा, प्रकल्पप्रमुख सुजय पांडे, संदीप लवांड यांनी व्यक्त केली आहे. सिन्नर, निफाड परिसरातील विविध गावांना संशोधन केंद्राच्या वतीने भेटी देण्यात आल्या. थ्रीप्स हा पिवळा कीटक असून तो पातीच्या गाभ्यातून रस शोषण करतो.
त्यामुळे पात पिवळी पडते. त्याचा कांदा पोषणावर दुष्परिणाम होतो. उत्पादन घटल्याचा परिणामही जाणवतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी उपाययोजना कराव्यात, असे आवाहन मनोजकुमार पांडे यांनी केले आहे. नियंत्रणासाठी हा करा उपाय : एक लिटर पाण्यात फिमोनील किंवा कार्बोसल्फान दोन मिली अथवा प्रोफेनोफाॅस एक मिली मिसळावे. या द्रावणाची दर दहा दिवसांनी फवारणी करावी. थ्रीप्सच्या नियंत्रणासाठी स्पायनोसॅण्ड ०.३ मिली प्रति लिटर पाण्यात टाकून त्याची फवारणी द्यावी. ती फायदेशीर ठरते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.