आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यातील १४ ग्रामपंचायतीच्या मतमोजणीत धक्कादायक निकाल लागले असून अनेक विद्यमान सरपंच, उपसरपंच सदस्यांना पराभवाचे धनी व्हावे लागले आहे. तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा बोलबाला राहिला. राष्ट्रवादी काँग्रेसचे ८, माकप ३, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे १ तर भाजपने २ ग्रामपंचायतीवर विजय मिळविला आहे. शिंदे गटाला खातेही उघडता आले नाही, मात्र काही ग्रामपंचायतींमध्ये त्यांचे सदस्य निवडून आले आहेत.
तालुक्यात १६ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक घेण्यात आली. यात बगडू व जयपूर ग्रामपंचायतींची सरपंच निवड अविरोध झाली आहे. यात एक ग्रामपंचायत राष्ट्रवादी काँग्रेसकडे तर एक माकपकडे गेली आहे. तालुक्यात उर्वरित १४ ग्रामपंचायतीच्या थेट सरपंच व सदस्यपदासाठी दि. १८ डिसेंबर रोजी मतदान घेण्यात आले. मंगळवारी (दि. २०) सकाळी १० वाजता प्रशासकीय इमारत मानूर येथे तहसीलदार बंडू कापसे यांच्या उपस्थितीत मतमोजणी झाली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.