आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकऱ्यांसह नागरिकांची‎ तारांबळ:मनमाड : पिके भिजली; बळीराजा पुन्हा संकटात‎

मनमाड22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहर आणि परिसरात‎ सोमवारी सलग दुसऱ्या दिवशी‎ जोरदार वारे आणि विजांच्या‎ कडकडाटासह आलेल्या बेमोसमी‎ पावसाने शेतकऱ्यांसह नागरिकांची‎ तारांबळ उडाली. कापून ठेवलेल्या‎ पिकांसह शेतात उभ्या गहू, कांदा,‎ पालेभाज्यांचेही नुकसान झाले.‎ ढगाळ वातावरणामुळे पिकांवर‎ रोगांचा प्रादुर्भाव होण्याची भिती‎ व्यक्त हाेत आहे.‎ रविवारी रात्री नऊच्या सुमारास‎ पावसाला सुरुवात झाली.

रात्रभर‎ अवकाळीचा शिडकावा सुरू होता.‎‎‎‎‎‎‎‎‎‎ दरम्यान, पाऊस आणि विजांमुळे‎ मनमाड-नांदगाव रोडवरील‎ उपकेंद्रात बिघाड झाल्याने शहराचा‎ वीजपुरवठा १६ तास खंडित झाला‎ हाेता. साेमवारी दुपारी तीनला‎‎‎‎‎‎‎‎‎‎ वीजपुरवठा पूर्ववत झाला. साेमवारी‎ दुपारी तासभर अवकाळी पाऊस‎ झाला. अवकाळी पावसाचा कांदा,‎ टोमॅटो, मिरची, गहू पिकास माेठा‎ फटका बसला.‎

बातम्या आणखी आहेत...