आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावाढत्या अपघातांमुळे मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी धाेकादायक ठरत आहे. संभाव्य अपघातांना आळा घालण्यासाठी अपघात प्रतिबंधात्मक उपाययाेजना कराव्यात अशी मागणी माजी आमदार आसिफ शेख यांनी केंद्रीय रस्ते व परिवहन वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली. शेख यांनी मंगळवारी दिल्लीत गडकरी यांची भेट घेत चर्चा करुन मागणीचे निवेदन दिले. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३ हा मालेगाव शहराजवळून जाताे. महामार्गाच्या दाेन्ही बाजूला यंत्रमाग कामगारांच्या दाट नागरी वस्त्या आहेत.
या महामार्गावर अपघात प्रवण क्षेत्र परिसरात भुयारी मार्ग, पथदीप, झेब्रा क्राॅसिंग पट्टे व गतिराेधके नाहीत. परिणामी ठराविक ठिकाणी नियमित अपघात घडत असतात. दाेन्ही वस्त्यांमधील नागरिकांना जीव मुठीत धरून महामार्ग ओलांडावा लागताे. वाढते अपघात पहाता भुयारी मार्ग, सर्व्हिसराेड, दिशादर्शक फलके, हायमास्ट दिवे, वाहतूक पाेलिसांनी नेमणूक आदी अपघात प्रतिबंधात्मक उपाययाेजना तातडीने करणे गरजेचे असल्याचे शेख यांनी मंत्री गडकरी यांच्या लक्षात आणून दिले. या मागणीची दखल घेत गडकरी यांनी स्वीय सचिवांना बाेलावून कार्यवाहीचे आदेश दिले आहेत. यादरम्यान शेख यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचीही भेट घेतली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.