आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराइंटरनेट सर्व्हरच्या अडचणीमुळे ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ऑनलाइन उमेदवारी अर्ज भरण्यास अडचणी निर्माण हाेत आहे. ही अडचण लक्षात घेऊन राज्य निवडणूक आयाेगाने ऑफलाइन पारंपरिक पद्धतीने नामनिर्देशनपत्र भरण्याची परवानगी दिली आहे. शुक्रवारी (दि.२) उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत अर्जाची स्वीकृती केली जाणार आहे.
राज्यभरातील ७७५१ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम घाेषित झाला आहे. २८ नाेव्हेंबरपासून ऑनलाइन उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र, सर्व्हेरच्या समस्येमुळे अर्ज भरण्याचा वेग थंडावला आहे. या अडचणीची दखल घेत आयाेगाने गुरुवारी पारंपरिक पद्धतीने ऑफलाइनद्वारे नामनिर्देशनपत्र स्वीकारण्याचा आदेश जारी केला आहे. इच्छुक उमेदवार अर्ज दाखल करण्यापासून वंचित राहू नये. त्यांना निवडणूक लढण्याची संधी मिळावी म्हणून ऑफलाइन अर्ज स्वीकृतीच्या सवलतीसह वेळेतही वाढ करण्यात आली आहे.
दुपारी साडेतीन वाजेपर्यंतची वेळ वाढवून सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत केली आहे. नामनिर्देशनपत्र व घाेषणापत्राचे काेरे नमुने उमेदवारांना उपलब्ध करून देण्याच्या सूचना आहेत. ऑफलाइन स्वीकारलेले नामनिर्देशनपत्र छाननी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर वैध ठरणारे अर्ज संगणक प्रणालीमध्ये भरून घेण्याची जबाबदारी तहसीलदारांवर साेपविण्यात आली आहे. अर्ज स्वीकृती तहसील कार्यालयात केली जाणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.