आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इशारा‎:कृषिपंपांना पूर्ण दाबाने‎ वीज द्या, अन्यथा आंदाेलन‎

सिन्नर‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाथरे बुद्रुक येथील वीज उपकेंद्रातून‎ कोळगावमाळ येथील कृषी पंपांना‎ कमी दाबाने वीज पुरवठा करण्यात‎ येत आहे. शिवाय केवळ पाच तास‎ वीज पुरवठा होत असल्याने पिकांना‎ पुरेसे पाणी देता येत नाही. वीज पुरवठा‎ आठ तास व पूर्ण दाबाने करावा,‎ अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.‎ याबाबत तहसीलदार एकनाथ बंगाळे,‎ महावितरणला मागणीचे निवेदन‎ देण्यात आले.

मागणीची दखल न‎ घेतल्यास उपोषण करण्याचा इशारा‎ देण्यात आला आहे.‎ पाथरे बुद्रुक वीज उपकेंद्रातून‎ कोळगाव माळला वीज पुरवठा केला‎ जातो. पाथरे बुद्रुक येथे वीज पुरवठा‎ सुरू असताना कोळगावमाळ येथील‎ सर्व वीज पुरवठा बंद करण्यात येतो.‎ तथापि, कोळगाव माळ येथे पुरवठा‎ करताना पाथरे बुद्रुक येथील‎ ट्रान्सफार्मर सुरूच ठेवले जातात.‎

शहा येथील १३२ वीज केंद्र सुरू‎ झाल्याने भरतपूर परिसर त्या केंद्रास‎ जोडण्यात यावा, लक्ष्मणपूर‎ परिसरातील ११ ट्रान्सफार्मर भरतपूरला‎ जोडावे. त्यामुळे कोळगावमाळ येथे‎ पुरेशा दाबाने वीज पुरवठा होण्यास‎ मदत होऊ शकेल.‎ देवपूर व शहा येथील ३३ केव्ही‎ वीज उपकेंद्र शहा येथील १३२ केंद्राला‎ जोडण्यात आली आहेत. त्यामुळे‎ वावी व पाथरे बुद्रुक परिसराला पूर्ण‎ क्षमतेने वीज पुरवठा होईल, असे‎ वाटले होते. परंतु, तसे झाले नाही.‎

याउलट कोळगावमाळ येथील‎ शेतकऱ्यांना आठ तास वीजपुरवठा‎ होत होता, आता तो केवळ पाच तास‎ केला जात आहे. शहा येथे पाचवा‎ फीडर तातडीने बसवावा, पाथरे‎ उपकेंद्र शहा येथे जोडण्यात यावे‎ अशी मागणी करण्यात आली आहे.‎ भाऊसाहेब थोरात, कारभारी जाधव,‎ सुभाष गवांदे संजय चंद्रे, रमेश गवांदे,‎ बाबासाहेब गवांदे आदींनी निवेदन‎ दिले.‎

बातम्या आणखी आहेत...