आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिरमोड:शरद पवारांनी कांद्यावर बोलणे‎ टाळले, कांदा उत्पादकांचा हिरमोड‎

कळवण‎15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

उत्तर महाराष्ट्रातील सर्वात उंच छत्रपती‎ शिवाजी महाराजांच्या पुतळा अनावरण‎ सोहळ्यासाठी उपस्थित असलेल्या माजी‎ केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी‎ शेतकऱ्यांना अपेक्षित कांद्याबद्दल आणि‎ जबाबदार असलेल्या केंद्र, राज्य‎ सरकारच्या धोरणाबद्दल शब्द न‎ काढल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या‎ पदरी निराशा आली.‎ सध्या कांद्याचे दर मोठ्या प्रमाणात‎ घसरल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये‎ शासनाबद्दल असंतोष आहे. अशा‎ परिस्थितीत माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद‎ पवार हे कांद्याचे आगार असलेल्या‎ तालुक्यात पुतळा अनावरण‎ सोहळ्यासाठी आल्याने मोठ्या प्रमाणात‎ शेतकरी वर्गाने हजेरी लावली.

यावेळी‎ पालकमंत्री दादा भुसे, माजी उपमुख्यमंत्री‎ छगन भुजबळ, प्रा. यशवंत गोसावी यांनी‎ कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या व्यथा‎ मांडल्या. तर युवराज संभाजीराजे यांनी‎ राजकारण्यांना शेतकऱ्यांचा विसर‎ पडल्याचा आरोप करत कांद्याचा वांदा‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ सोडविण्यासाठी कांद्याला हमीभाव देऊन‎ कांदा प्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी‎ शासनाने पुढाकार घेण्याची विनंती केली.‎ यामुळे कांद्याच्या एकंदर व्यावसायिक व‎ राजकीय परिस्थितीबद्दल सखोल माहिती‎ आणि अभ्यास असणारे माजी केंद्रीय‎ कृषीमंत्री कांद्याबद्दल सध्याच्या‎ शासनाच्या धोरणावर बोलतील ही‎ उत्सुकता शेतकऱ्यांना होती. मात्र पवारांनी‎ कांद्याबद्दल एकही शब्द न बोलता,‎ पुतळ्याचे अनावरण झाल्याचे सांगत‎ पगार द्वयींचे अभिनंदन करून फक्त दोन‎ मिनिटांत आपले भाषण संपवून काढता‎ पाय घेतला. यामुळे उपस्थित कांदा‎ उत्पादकांचा हिरमोड झाला.‎

बातम्या आणखी आहेत...