आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सूचना‎:येवला शहर वाढीव पाणीपुरवठा‎ योजनेचा प्रस्ताव शासनास सादर करा‎

येवला‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहराला सद्या चार दिवसाआड‎ पाणीपुरवठा केला जात अाहे.‎ त्यामुळे येवलेकरांना रोज पाणी‎ मिळावे, शहराचा विस्तार‎ दिवसेंदिवस वाढत असल्याने‎ वाढलेल्या वसाहतींचा अभ्यास‎ करून भविष्यातील पाण्याची गरज‎ लक्षात घेत अमृत २ अभियानातून‎ येवला नगरपरिषदेच्या वाढीव‎ पाणीपुरवठा योजनेचा प्रस्ताव‎ शासनास सादर करावा, अशा सूचना‎ माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ‎ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.‎

भुजबळ यांच्या नाशिक येथील‎ संपर्क कार्यालयात‎ अधिकाऱ्यांसमवेत बैठक पार पडली.‎ यावेळी पालिकेचे मुख्याधिकारी‎ नागेंद्र मुतकेकर, दिलीप खैरे‎ यांच्यासह या योजनेचे सल्लागार‎ आणि अधिकारी उपस्थित होते.‎ भुजबळ म्हणाले की, शहराला‎ सद्या चार दिवसाआड पाणीपुरवठा‎ केला जात असल्याने येवलेकरांना‎ रोज पाणी मिळाले पाहिजे. शहराची‎ लोकसंख्या साधारणतः ७० हजार‎ आहे. शहरातील अस्तित्वातील‎ पाणीपुरवठा योजना २०१३ मध्ये पूर्ण‎ झालेली आहे. मात्र, त्यानंतर‎ शहराची मोठ्या प्रमाणात वाढ‎ झाल्यामुळे नव्याने निर्माण झालेल्या‎ नागरी वस्तीमुळे या पाणीपुरवठा‎ योजनेवर ताण निर्माण झाला आहे.‎

पालखेड डावा कालवा उद‌्भव‎ असलेल्या शहर पाणीपुरवठा‎ योजनेच्या साठवण तलावाची क्षमता‎ कमी पडत असल्यामुळे शहराला‎ कधी कधी तर ५/६ दिवसाआड पाणी‎ दिले जाते. शहर पाणीपुरवठा‎ योजनेच्या साठवण तलावाची क्षमता‎ वाढवणे किंवा नवीन साठवण तलाव‎ निर्माण करणे, शहरातील सर्व घरांना‎ नळ जोडणी देण्याकरिता वाढीव‎ कुटुंबासाठी व नव्याने निर्माण‎ झालेल्या वसाहतींसाठी अंतर्गत‎ वितरण व्यवस्था निर्माण करणे,‎ नादुरुस्त जलवाहिन्या बदलणे,‎ पाणीपुरवठा वितरण व्यवस्थेत‎ सुधारणा करणे, या कामांचा वाढीव‎ पाणीपुरवठा योजनेच्या सविस्तर‎ प्रकल्प अहवालामध्ये समावेश‎ करावा अशा सूचना त्यांनी दिल्या.‎

बातम्या आणखी आहेत...