आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्कार:मनाच्या गाभ्यातून होणाऱ्या काव्य‎ निर्मितीस काळाचे बंधन नसते‎

मालेगाव‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

"कोणत्याही काव्याच्या निर्मितीसाठी विशिष्ट काळाचे बंधन नसते.‎ स्वातंत्र्य देवीची विनवणी या‎ काव्याची निर्मिती करताना‎ कुसुमाग्रजांनी प्रसिद्धीस देऊनही ती‎ तीन वेळा परत मागून नव्याने दुरुस्त‎ करून दिली होती. काव्याची निर्मिती‎ ही मनाच्या गाभ्यातून होते. असे‎ उद्गार लेखक व जेष्ठ पत्रकार‎ उत्तम कांबळे यांनी येथे काढले येथील इंडियन मेडिकल‎ असोसिएशनच्या सभागृहात डॉ.‎ उज्वला देवरे यांच्या ''काव्य‎ एकषष्ठी'' या काव्यसंग्रहाचे प्रकाशन‎ करताना ते बोलत होते.‎ ‎

व्यासपीठावर विष्णू थोरे, विनोद‎ पाटील ,रवींद्र मगर, शिवाजी देवरे,‎ प्रा उज्वला देवरे हे होते.‎ कांबळे म्हणाले, समाजाने‎ साहित्यिकांवर मोठे प्रेम केले‎ पाहिजे. त्यांच्यामुळे सुसंस्कृत‎ समाज निर्माण व्हायला मदत होते.‎ काव्य निर्मिती ही वयातीत असते‎ त्यामुळेच २०० वर्षांपूर्वी निर्माण‎ झालेल्या कविता आजही ताज्या‎ वाटतात. बालकवींच्या कविता‎ आपण आजही गुणगुणतो. कवी हे‎ काव्य वेडे असतात.‎ नवनिर्मितीसाठी ते वेडे होतात.‎ काहीतरी करण्याशिवाय‎ करण्यासाठी असे वेडे व्हावे लागते.‎ यावेळी अॅड शिशिर हिरे, विनोद‎ पाटील, रवींद्र मगर यांची भाषणे‎ झाली.‎ डॉ. विनोद गोरवडकर यांनी‎ प्रास्ताविक केले. डॉ. विनीत देवरे व‎ डॉ. विशाल देवरे यांनी मान्यवरांचा‎ सत्कार केला. सूत्रसंचालन अभय‎ दीक्षित यांनी केले.‎

बातम्या आणखी आहेत...