आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिरवणूक:बेपत्ता मुलगा सापडला अन् ग्रामस्थांनी जल्लोष केला‎

मनमाड‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ग्रामस्थांनी एखादी गोष्ट ठरवली‎ आणि मनापासून केली तर अशक्य‎ ते शक्य होते याची प्रचिती नांदगाव‎ तालुक्यातील वंजारवाडी येथे‎ आली. गावातील १४ वर्षांचा सम्या‎ हा मतिमंद मुलगा अचानक हरवला.‎ संपूर्ण गावाला त्याची चिंता वाटू‎ लागली. मग ग्रामस्थांनीही‎ आपापल्यापरीने सोशल मीडियाचा‎ आधार घेत शोधमोहीम सुरू केली‎ आणि या प्रयत्नांना यश आले.‎ बेपत्ता झालेला सम्या नाशिक येथे‎ मिळून आला आणि ग्रामस्थांचा‎ जीव भांड्यात पडत एकच जल्लोष‎ केला.‎ वंजारवाडी येथील अरुण शरद‎ खैरनार ऊ र्फ सम्या ( १४) हा‎ अचानक बेपत्ता झाला.

ग्रामस्थांनी‎ त्याचा बराच शोध घेतला पण तो‎ मिळून आला नाही. अखेर मनमाड‎ शहर पोलिस ठाण्यात याबाबत‎ रितसर नोंद करण्यात आली.‎ ग्रामस्थांनीही आपापल्यापरीने त्याचा‎ शोध सुरू केला. प्रत्येकाने त्याचा‎ फोटो स्टेट‌्स आपल्या मोबाइलवर‎ ठेवला. सम्या ऊर्फ अरुण हा‎ मतिमंद आहे. तो स्वतःचे‎ नावदेखील सांगू शकत नसल्याने‎ ग्रामस्थांची चिंता वाढू लागली. तो‎ अत्यंत गरीब परिवारातील आहे.‎ आई-वडील हातमजुरी करून‎ आपला उदरनिर्वाह चालवतात.‎ त्यामुळे संपूर्ण गावाला सम्याची‎ चिंता वाटू लागली.‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ आठ दिवस उलटून गेले तरीदेखील‎ त्याचा शोध लागू शकला नाही, पण‎ ग्रामस्थांनी आपले प्रयत्न सुरूच‎ ठेवले. वंजारवाडीतील एक‎ कर्मचारी संदीप अहिरे हे कामासाठी‎ नाशिकला गेले होते.

ते नाशिकराेड‎ रेल्वेस्टेशनवर मनमाड येथे‎ येण्यासाठी आले. तेव्हा‎ रेल्वेस्थानकात त्यांची नजर समोर‎ उभ्या असलेल्या सम्यावर पडली,‎ त्यांनी तत्काळ त्याला जवळ घेतले‎ आणि वंजारवाडी गावात फोन‎ करून सम्या सापडल्याची माहिती‎ दिली. हे वृत्त गावात पसरताच संपूर्ण‎ गावात आनंद पसरला. सम्याचे‎ गावात आगमन होताच गावकऱ्यांनी‎ डीजे लावून एकच जल्लोष केला.‎ गावात मिठाई वाटून आनंदोत्सव‎ साजरा करण्यात आला.‎

बातम्या आणखी आहेत...