आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संयुक्त कारवाई:येवल्यात विंचूर चौफुली ते इंद्रनील‎ कॉर्नरपर्यंतचा भाजीपाला बाजार हटवला‎

येवला‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील विंचूर चौफुली ते इंद्रनील‎ कॉर्नर पर्यंत भाजीपाला व फळ‎ विक्रेत्यांनी केलेले अतिक्रमण पालिका व‎ शहर पोलिस ठाण्याच्या संयुक्त‎ कारवाईने हटवण्यात आले.‎ विंचूर चौफुलीवरील अनधिकृत फळ‎ विक्रेते व इंद्रनील हॉटेल कॉर्नर येथील‎ भाजीपाला विक्रेते यांनी महामार्गालगत‎ मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण केले होते.‎ वेळोवेळी पालिका कार्यालयात या‎ विक्रेत्यांची बैठक घेऊन पालिकेने तयार‎ केलेल्या भाजीपाला व फळ‎ विक्रेत्यांसाठी केलेल्या ओट्यावर‎ बसावे, अशा सूचना दिल्या होत्या.

परंतु‎ हे विक्रेते दुर्लक्ष करत विंचूर‎ चौफुलीपासून इंद्रनील कॉर्नर पर्यंत‎ विक्रीसाठी बसत होते. यामुळे धडक‎ मोहीम राबवत पालिका व पोलिस‎ प्रशासनाने रहदारीला अडचण निर्माण‎ करणाऱ्या अनधिकृत टपऱ्या व इतर‎ साहित्य जप्त करून अतिक्रमण हटविले.‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ नागरिकांसाठी दैनंदिन बाजाराची‎ व्यवस्था ओट्यांचे बांधकाम पालिकेने‎ करून दिले आहे.

तथापि नगर परिषदेने‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ वेळोवेळी सूचना देऊन देखील सदर‎ विक्रेते त्या ठिकाणी बसून व्यवसाय करत‎ नव्हते. त्यामुळे विंचूर चौफुलीवर‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ विक्रेत्यांची जास्त गर्दी झाल्यामुळे‎ रहदारीस अडथळा निर्माण होत होता.‎ पालिका प्रशासक नागेंद्र मुतकेकर यांच्या‎ मार्गदर्शनाखाली अतिक्रमण मोहीम‎ राबवण्यात आली. याप्रसंगी पोलिस‎ उपनिरीक्षक सूरज मेढे, कर विभाग‎ प्रमुख आदित्य मुरकुटे, नगररचना‎ विभाग प्रमुख भावे, स्वच्छता निरीक्षक‎ सागर झावरे आदी उपस्थित होते. ‎

यापुढे मोहीम सुरुच राहणार‎
सर्व भाजीपाला व फळ विक्रेत्यांना नवीन बाजारतळात बसूनच व्यवसाय करावा अन्य‎ ठिकाणी बसून रहदारीस अडथळा आणू नये असे आवाहन पालिकेने केले आहे.‎ यापुढे देखील अतिक्रमण हटाव मोहीम सुरू राहणार असल्याचा इशारा दिला आहे.‎

बातम्या आणखी आहेत...